Headlines

शेखर गुप्ता यांचा कॉलम:पाकिस्तानी हुकूमशहांचा शेवट एकसारखाच होतो‎




‎‎‎‎‎‎‎‎सर्व हुकूमशहा उन्मत्त असतात. कारण ते कधीच निवृत्त‎होण्याचा विचार करत नाहीत. आज सत्तेत असताना ते‎आपल्या प्रजेचे नशीब ठरवत असतील, पण उद्या जेव्हा‎सत्ता जाईल तेव्हा त्यांचे काय होईल हे ते ठरवू शकत‎नाहीत. यामुळेच पाकिस्तानचे सर्व हुकूमशहा एका विशिष्ट‎काळानंतर उन्मादग्रस्त झाल्याचे दिसतात. हा उन्माद‎दिसायला साधारणपणे 5 ते 7 वर्षे लागतात. पण असीम‎मुनीर यांच्याबाबतीत हे ‘टी-20’ च्या वेगाने घडत आहे.‎‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मुनीर यांनी स्वतःकडे आणखी‎अधिकार आणि पदे घेतली आहेत. मात्र, नुकतेच‎पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने लष्कराशी संबंधित दोन‎कायद्यांवर ज्या प्रकारे मोहोर उमटवली त्याने सत्ताकारणावर‎बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले.‎ पाकिस्तान सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नॅशनल‎कमांड ॲथॉरिटी अ‍ॅक्ट 2010’ मधील सुधारणा आणि नव्या‎‘डिफेन्स फोर्सेस अ‍ॅक्ट 2026’ ला मंजुरी दिली गेली. हे‎कायदे थेट नॅशनल असेंब्लीत मांडले गेले. अवघ्या 30‎मिनिटांत ते मंजूर करून सभागृहाचे कामकाज तहकूब‎करण्यात आले. सत्ताधारी आघाडीतील दुसरा सर्वात मोठा‎पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने आक्षेप घेतला.‎पण त्यांनी कायद्याच्या बाजूनेच मतदान केले. पीपीपीच्या‎राष्ट्रपतींनी त्यावर पटापट स्वाक्षऱ्याही केल्या.‎ पाकिस्तानच्या घडामोडींचे काही अभ्यासक म्हणतील की,‎हे कायदे त्या 27 व्या घटनादुरुस्तीलाच मागील तारखेपासून‎(नोव्हेंबर 2025) लागू करतात. या अंतर्गत राज्यघटनेची‎मोडतोड करून ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’‎(सीडीएफ) हे पद तयार करण्यात आले होते. आणि हे पद‎फक्त लष्करप्रमुखांनाच मिळेल, असे ठरवण्यात आले‎होते. यामुळे मुनीर यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2030 पर्यंत‎वाढला आहे. त्यांना आजन्म ‘फील्ड मार्शल’ बनवण्यात ‎‎आले आहे. तसेच त्यांच्यावर कधीही कोणताही खटला ‎‎चालवला जाऊ शकत नाही, अशी व्यवस्था केली गेली‎आहे. मुनीर यांनी जे जादा अधिकार बळकावले आहेत ते ‎‎भयंकर आहेत. हे अधिकार प्रचंड असुरक्षिततेची भावना‎किंवा दहशतीतून निर्माण झालेल्या उन्मादामुळेच‎मिळवण्यात आले आहेत. प्रत्येक हुकूमशहाला एका ‎‎काळानंतर स्वतःच्या सावलीचीही भीती वाटू लागते. मुनीर ‎‎यांच्यात ही भीती वेळेआधीच निर्माण झाली आहे. नव्या ‎‎कायद्यांनुसार मुनीर जवानांना आपल्या मर्जीने ‘हायर,‎फायर आणि रिटायर’ करू शकतात किंवा त्यांचा‎कार्यकाळ वाढवू शकतात. हे ते फक्त निष्ठावान सुभेदार,‎मेजर किंवा कर्नल यांच्यासोबतच नाही, तर समकक्ष ‎‎अधिकाऱ्यांसोबतही करू शकतात. ते आपल्या कोणत्याही ‎‎जनरलला, विशेषतः कोर कमांडरला निवृत्त करू शकतात ‎‎किंवा त्यांचा कार्यकाळ वाढवू शकतात. यामुळे एकतर हे‎लोक त्यांना घाबरू लागतील. दुसरे म्हणजे ते लालची बनू ‎‎शकतात. कोर कमांडर्समध्ये अस्वस्थता आणि कुजबूज ‎‎वाढली आहे.‎ मुनीर सर्वांच्या वर जाऊन बसले आहेत आणि‎उत्तराधिकारी होण्याचा मार्गच बंद झाला आहे. एक जुनी ‎‎समजूत आहे की, सर्व हुकूमशहा एकाकी आणि घाबरलेले‎असतात. मुनीर ज्या भीतीने ग्रस्त आहेत त्याला‎‘अ‍ॅक्रोफोबिया’ म्हणजेच उंचीची भीती म्हटले जाऊ‎शकते. ते खूप लवकर खूप उंचीवर जाऊन बसले आहेत.‎आता याहून वर कुठे जायचे किंवा इथून खाली तर पडणार‎नाही ना, हे त्यांना समजत नाही.‎ पाकिस्तानची राष्ट्रीय ताकद कमी होत चालली आहे. ती‎केवळ त्यांच्या लष्करावरच अवलंबून राहिली आहे. त्यांची‎अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सौदी अरेबियाकडून‎मोठी मदत कशी मिळवायची याव्यतिरिक्त अर्थव्यवस्थेत‎प्राण फुंकण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. पण‎सौदी अरेबिया स्वतः कर्जात बुडालेला आहे. तो 1-2 अब्ज‎डॉलर्सपेक्षा जास्त मदत देऊ शकत नाही. ती मदतही लष्करी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सेवांच्या बदल्यात केवळ उपकार म्हणून असते. तसेही‎नुसती अपेक्षा ठेवणे म्हणजे नियोजन नव्हे. लष्करालाही‎काही मर्यादा आहेत. ते पश्चिम सीमेवरील बंडाळ्या मोडून‎काढू शकत नाही किंवा लष्करी बाबतीत भारतावर कुरघोडी‎करू शकत नाही. ते अधूनमधून एखादा वाद उभा‎करण्याव्यतिरिक्त दुसरे काहीच करू शकत नाही. मुनीर‎यांचे प्राबल्य लष्करी प्रकरणांमध्ये नाही. पण लष्कराच्या‎विळख्यात अडकलेल्या त्यांच्या देशातील भ्रष्ट‎राजकारणाची त्यांना सखोल समज आहे. त्यांना‎धोक्यांचाही अंदाज आहे. हे काही सामान्य राजकारण‎नाही. यासाठी मी तीन शब्द सुचवू शकतो – गळेकापू,‎पाठीत खंजीर खुपसणारे किंवा निर्दयी. मुनीर आपले‎भविष्य सुरक्षित करू शकत नाहीत. त्यांना आपला‎वर्तमानकाळ सुरक्षित ठेवण्याचीच काळजी सतावत‎राहील. पण हे नवे कायदे त्यांच्या छातीवर आणखी एका‎चिलखताचेच काम करतील. मुनीर 58 वर्षांचे आहेत.‎लष्करप्रमुख म्हणून त्यांचे 5 वे वर्ष सुरू आहे. 30 नोव्हेंबर‎2030 रोजी जेव्हा त्यांचा 5 वर्षांचा नवा कार्यकाळ संपेल‎तेव्हा ते केवळ 62 वर्षांचे असतील. या वयात भारताचे‎लष्करप्रमुख निवृत्त होतात. 2030 नंतर ते कुठे जाणार, हे‎त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल. अनेक पाकिस्तानी‎लोकांना वाटते की, याच्या खूप आधीच ते स्वतःला‎राष्ट्रपती घोषित करतील. आणि या पदावर त्यांचा कोणताही‎निश्चित कार्यकाळ नसेल. म्हणजेच ते आयुष्यभर सत्तेत‎राहू शकतात. ते कदाचित बरोबर विचार करत असतील.‎पण त्यांच्या आधीच्या हुकूमशहांचा इतिहास हेच सांगतो‎की, वेळ कोणासाठीही थांबत नाही. कोणत्याही पाकिस्तानी‎हुकूमशहाचे तीनच शेवट असू शकतात – तुरुंग, हद्दपारी‎किंवा हत्या. माझ्या या भविष्यवाणीवरून मुशर्रफ यांनी मला‎एकदा ‘फटकारले’ देखील होते. दावोसच्या परिषदेत‎माझ्याकडे बोट दाखवत त्यांनी हुकूमशहांच्या या तीन‎शेवटांबाबतच्या माझ्या विश्लेषणाकडे लक्ष वेधले होते. ते‎म्हणाले होते की, एक काळ असा होता जेव्हा तुमच्या‎विश्लेषणाला किंमत होती, पण आता नाही. ते म्हणाले होते,‎‘तुम्ही चुकीचे आहात, कारण तुम्ही मला हुकूमशहा मानता.‎मी हुकूमशहा नाही, तर लोकशाहीवादी आहे.’ खरे तर‎हुकूमशाही आणि मतिभ्रम या दोन्ही गोष्टी हातात हात‎घालून चालतात. मी मुनीर यांच्या भविष्याचा अंदाज‎लावला तर ज्या शक्यता दिसतात, त्यात निवृत्त होऊन घरात‎बसणे आणि गोल्फ खेळत वेळ घालवणे हे निश्चितच‎समाविष्ट नाही. ‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ मुनीरही त्याच वाटेवर आहेत…‎अयुब खान आणि याह्या खान यांनी 1965 आणि‎1971 मध्ये लष्करी अतिसाहस करून स्वतःच्या‎विनाशाला आमंत्रण दिले. झिया-उल-हक‎सत्तेच्या शिखरावर असतानाच दुर्दैवाचे बळी‎ठरले. परवेझ मुशर्रफ यांची अवस्था अशी झाली‎की, त्यांना देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे‎लागले. मग भविष्य मुनीर यांच्याशी वेगळ्या‎प्रकारे का वागेल?‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत