Marambalpada-Jalsaar Jetty Services: वसई-विरारमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीसाठी जलमार्गाचा उपाय मिळाला आहे. जलसार-मारंबळपाडा जलवाहतुकीद्वारे 10 महिन्यांत 1 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला आहे. या कालावधीत एक लाखाहून अधिक प्रवासी, ७८ हजार ४६० वाहने तसेच ७,५४५ जनावरे या जलमार्गातून सुरक्षित वाहून नेण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर वाहतूककोंडीतही हा जलमार्ग प्रवाशांना आधार ठरत आहे.
वाहतूक कोंडीला उपाय
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे अनेक वेळा नागरिक व प्रवासी अडकून पडत होते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. भाईंदर ते नायगाव दरम्यानच्या खाडीवर पूल उभारण्याच्या दृष्टीने तसेच वसई तालुक्यातील विरार जवळील नारिंगी ते पालघर तालुक्यातील सफाळे जवळील जलसार किंवा दातीवरेदरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र, निधी उपलब्ध न झाल्याने तो प्रकल्प रखडला. त्यामुळे नागरिकांना वसई, ठाणे, भाईंदर व मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करावा लागत होता.
दरम्यान, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने ठाणे-भाईंदर जलमार्ग सुरू केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील जलसार ते मारंबळपाडा या जेटींवरून एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत जलमार्गाद्वारे प्रवासी व वाहन वाहतूक नियमितपणे सुरळीत पार पडली. महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाल्याच्या वेळी अनेक प्रवासी, मालवाहू वाहने व अवजड वाहनांनी या जलमार्गाचा वापर करून वेळेची बचत केली आहे.
इथेही फुकटे प्रवासी
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत प्रवासी सुरक्षा, वेळेचे काटेकोर पालन व सुविधा सुधारणा यांना प्राधान्य दिले जात आहे. भविष्यात सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, काही प्रवासी तिकीट न घेता प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी या जलमार्ग वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त लाभघ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा