Headlines

वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्या मुला-मुलीचा हक्क राहतो का? हे कितपत कायदेशीर, नियम काय सांगतो


Sons’ Rights over Father’s Property: मालमत्ता, संपत्तीवरून अनेक कुटुंबात वाद होतात. मालमत्तेचा प्रकार, हस्तांतरण कसे झाले आणि इतर वारसांचे हक्क यावर वाद अवलंबून असतात. हा पैलू समजून घेतल्यास अनेक समस्या समाज सोडवल्या जाऊ शकतात आणि अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे.

Son's Rights over Father's Property
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Son’s Property Rights : मालमत्तेसंदर्भात सर्वात मोठा प्रश्न आहे की वडील आपली अख्खी मालमत्ता एकाच मुलाच्या नावे करू शकतात का? मालमत्तेशी संबंधित भांडण अनेकदा कौटुंबिक वादांचे मूळ कारण बनतात, जे न्यायालयात वर्षानुवर्षे चालतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये वडिलांनी मृत्युपत्र केलेले असते, ज्यात सर्व वारसांना मालमत्ता आणि संपत्तीत समान हिस्सा मिळतो. मात्र काही प्रकरणांमध्ये वडील स्वतःच्या निर्णयाने किंवा एका मुलावरील अती प्रेमापोटी आपली अख्खी मालमत्ता त्याच्या नावे करतात.

वडील एका मुलाच्या नावावर करू शकतात का?

अशा परिस्थतीत गाव असो वा शहर, वडील आपली सर्व जमीन किंवा मालमत्ता एका मुलाच्या नावावर करून इतर मुलांना बेघर करू शकतात का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. बऱ्याच लोकांना वाटत की मालमत्ता किंवा संपत्तीच्या मालकाने घेतलेला निर्णय शेवटचा असतो, त्याला कोणी प्रश्न करू शकत नाही. मात्र, कायदेशीर चित्र थोडे वेगळे आहे. खरा फरक मालमत्तेच्या प्रकारावर अवलंबून असतो.
Maharashtra TimesCrude Oil : इंधन तुटवड्याची कटकट संपणार, भारतासाठी आनंदाची बातमी; 4 महिन्यांनंतर तेलाची विहीर पुन्हा उघडली; पाहा काय फायदा होणार
म्हणजे वडिलांनी मालमत्ता स्वतःच्या वैयक्तिक उत्पन्नातून खरेदी केली आहे की वारसा हक्काने मिळाली आहे? अशाप्रकारे, दोन्ही परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हक्क ठरवले जातात. त्यामुळे भावना किंवा कौटुंबिक नाराजीच्या आधारावर एखाद्याचे हक्क काढून घेतले जाऊ शकतात का? याबद्दल कायदा काय सांगतो जाणून घेऊया.

सर्वप्रथम मालमत्तेचा प्रकार, हस्तांतरण कसे झाले आणि इतर वारसांचे काय हक्क आहेत कायदेशीर निर्णय अवलंबून आहे. वरील पैलू समजून घेऊनच अनेक प्रकरणांमध्ये मालमत्तेचे वाद सहजपणे सोडवले जाऊ शकतात. विशेषतः अशा प्रकरणांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी आपल्या निर्णयांद्वारे घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना समजून घेतल्यास कोणताही मालमत्तेतील गुंता न्यायालयात न जाता, सुरुवातीच्या टप्प्यावरच सोडवला जाईल.
Maharashtra TimesAI Bubble Burst: भारताला मागे सारणाऱ्या कोरिया बाजारात पॅनिक सेलिंग, गुंतवणूकदार झाले अलर्ट! ‘एआय’चा फुगा फुटला; Apple च्या धक्क्याने बाजार हादरला

वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणाचा किती हक्क?

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केली जाते. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलं आणि मुली या दोघांचाही जन्माने हिस्सा असतो तर, वडील जमिनीचे एकमेव मालक नसतात. वडिलोपार्जित मालमत्तेत वडिलांचा एकमेव मालक नसतो, म्हणजे स्वतःच्या इच्छेने संपूर्ण जमीन कोणत्याही एका मुलाच्या नावावर हस्तांतरित करू शकत नाही.

उदाहणार्थ समजा की एका कुटुंबात वडील आणि 3 मुले आहेत तर, अशा परिस्थितीत मालमत्तेचे चार हिस्से होतात. वडील स्वतःचा वाटा म्हणजे केवळ एक चतुर्थांश हिस्स्याबद्दल निर्णय घेऊ शकतात आणि उर्वरित मुलांच्या वाट्याचा निर्णय ते घेऊ शकतात. म्हणजे वडिलांनी संपूर्ण जमीन एका मुलाच्या नावे केली, तरी उर्वरित मुले न्यायालयात जाऊन आपल्या वाट्यावर दावा करू शकतात.
Maharashtra TimesITR भरण्याची तयारी, पण आधी 1 लाख रुपये वाचवणारे Section 80D समजून घेणे अत्यावश्यक, तुमचा मोठा कर वाचेल
स्व-अर्जित मालमत्तेबाबत नियम काय?
दुसरीकडे, वडिलांनी स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेल्या मालमत्तेच्या मालकाला आपल्या मर्जीने संपत्तीचे वाटप करण्याचे अधिक स्वातंत्र्य असते आणि आपल्या इच्छेने एक मुलगा, मुलगी किंवा अगदी बाहेरील व्यक्तीच्या नावेही मृत्युपत्र बनवू शकतो. इतर मुलांना जन्माने कोणताही कायदेशीर हक्क नसतो पण स्व-अर्जित मालमत्तेच्या बाबतीत मृत्युपत्र बनवले नसेल आणि वडिलांचे निधन झाले, तर वारसा हक्काने मालमत्तेचे वाटप केले जाईल.

म्हणजे अशा प्रकरणात सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान हिस्सा मिळेल. सोप्या शब्दात बोलायचे तर, वडिलोपार्जित मालमत्तेतील प्रत्येकाचे हक्क असते पण, स्व-अर्जित मालमत्तेमध्ये मालकाची इच्छाच ग्राह्य धरली जाते. त्यामुळे मालमत्ता स्व-अर्जित असेल, तर वडील आपल्या इच्छेनुसार कोणालाही मालमत्तेतून बाहेर काढू शकतात आणि कोणाच्याही नावावर करू शकतात.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा