Headlines

रोहितनं अजून किती परीक्षा द्यायच्या? २०२७ वर्ल्डकपवरुन अजिंक्य रहाणेने निवड समितीला सुनावलं, काय म्हणाला?


मुंबई : रोहित शर्मा २०२७च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहितसारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्येक मालिकेनंतर तपासण्यापेक्षा त्याला थेट २०२७च्या वर्ल्डकपसाठी तयार ठेवावं, असं रहाणेने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर बीसीसीआय आणि निवड समितीने रोहितला स्पष्टपणे सांगावं की, तो वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रहाणेने रोहितच्या अनुभवाचं महत्त्व सांगितलं. २०२७चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. तिथल्या आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजी करण्याचा रोहितकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे अशा मोठ्या स्पर्धेत त्याचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो, असं रहाणेचं मत आहे.

Maharashtra TimesCricketer Ramandeep Singh Wedding : टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरची 7 वर्ष मोठ्या लोकप्रिय अभिनेत्रीने काढली विकेट! गुपचूप उरकला विवाह, कोण आहे पत्नी?

रोहितच्या निवृत्तीची चर्चा कशाला?

रहाणेच्या मते, रोहितने वर्ल्डकप खेळायचा निर्णय घेतला असेल, तर त्याच्या निवडीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. “रोहित शर्माला तो २०२७च्या वर्ल्डकपमध्ये खेळणार असल्याचं सांगणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांतील त्याचं योगदान पाहता त्याच्या अनुभवाची भारताला गरज आहे. त्याच्या निवृत्तीबाबत चर्चाच व्हायला नको. एकदा तुम्ही त्याला सांगितलं की, ‘रोहित, तू खेळणार आहेस’, की विषय संपला. तो इतका मोठा खेळाडू आहे की प्रत्येक मालिकेच्या आधारावर त्याचं मूल्यांकन करता कामा नये,” असं रहाणेने सांगितलं.

Maharashtra TimesInd Vs SL Test Practice Match : श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टआधी धोक्याची घंटा, टीम इंडियाचे 5 खेळाडू सराव सामन्यातच फेल! नेमके कोण? जाणून घ्या

वरिष्ठ खेळाडूंना विश्वास देणं गरजेचं

क्रिकेटमध्ये खेळाडूची लय आणि मानसिकता यांना मोठं महत्त्व असतं. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने विश्वास देणं आवश्यक असल्याचं रहाणेने स्पष्ट केलं. “वरिष्ठ खेळाडूंना आदर मिळायला हवा. क्रिकेट हा लयीचा खेळ आहे. चांगली लय मिळवण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोहितला योग्य मानसिकतेत राहण्यासाठी तसं वातावरण मिळालं पाहिजे. २०२७च्या वर्ल्डकपमध्ये त्याचा अनुभव भारतासाठी निर्णायक ठरू शकतो,” असं रहाणे म्हणाला.

रहाणेने पुढे रोहितच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नसल्याचंही सांगितलं. संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. रोहितला २०२७चा वर्ल्डकप खेळायचा असेल, तर त्याला खेळू द्यावं, अशी स्पष्ट भूमिका रहाणेने मांडली.

Maharashtra TimesRishabh Pant : ऋषभ पंतला कुठे मिळणार जमीन? मुख्यमंत्र्यांचा 12 तासांतच प्रतिसाद, पुष्कर सिंह धामी नेमकं काय म्हणाले?

२०२६मध्ये रोहितची कामगिरी

दरम्यान, रोहितने २०२६मध्ये आतापर्यंत ८ वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एका शतकासह ३०० धावा आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ३७.५० असून स्ट्राइक रेट ९२.५ आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडेत रोहितने १३८ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली.

आता २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी रोहितला संघात स्थान मिळतं का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. रोहितने आतापर्यंत २८८ वनडे सामन्यांत ३४ शतकं आणि ६२ अर्धशतकांच्या मदतीने ११,८९५ धावा केल्या आहेत. त्यामुळे २०२७च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याचा अनुभव भारतासाठी किती महत्त्वाचा ठरतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.