Headlines

दबाव आणून मला त्रास देण्यात येत आहे,मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतियांना दिलं जातंय; धनकवडी जमीन प्रकरणात अभिनेत्री उषा चव्हाण यांचे प्रशासनावर गंभीर आरोप


मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या नृत्यानं तसंच अभिनयानं अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सध्या पुण्यातील त्यांच्या कौटुंबिक जमिनीच्या वादामुळं आणि टीडीआर हस्तांतरण प्रकरणावरून चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणात आपल्यालावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओ शेअर करत केलाय. तसंच त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनावर आरोप केले आहेत. कोर्टाचे आदेश असतानाही महानगरपालिका हस्तक्षेप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे उषा चव्हाण यांनी त्यांच्या व्हिडिओत?

नमस्कार, मी आपली उषा चव्हाण बोलतेय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतक्या दिवस कुठे गायब होते. आता सात दिवसांनी ३ महिने होतील. मी माझा जीवनगौरव पुरस्कार दिघे साहेबांच्या आश्रमात ठेऊन आलेले. त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तेव्हा खात्री दिलेली. सगळ्या गोष्टी मला विचारून घेतल्या. कायदेशीर बाबी होत्या, त्या सगळ्या मी आणि माझ्या मुलांनी त्यांना सांगितल्या. हे ऐकल्यानंतर त्यांनी मला निश्चितपणे सांगत, वचन दिलं होतं होतं की, उषाताई मी तुमचं काम करणार.

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra फेम ओंकार राऊतची मोठ्या पडद्यावर वर्णी, कोकणातील गूढकथेवर आधारित मराठी सिनेमा; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पण आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालतायतून एक पत्र आलंय. त्यात काहीही लिहिलंय. ज्या टीडीआरसाठी मी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. त्याच वेळी माझ्या विरोधातल्या लोकांचे काही उपद्व्याप मंत्रालयात चालले होते. हे मला नंतर कळलं. ज्यासाठी मी इतकं कष्ट केलंय, त्रागा केलाय. तो हिस्सा मी पुणे महानगरपालिका एका परप्रांतीयाला देऊन टाकतेय. कागदपत्री सगळे हक्क असताना. आम्हा माय लेकरांना त्रास देऊन काय मिळालं त्यांना. उलट बदनामी केलीय त्यांनी पुणे महानगरपालिकेची. काय अधिकार आहे हो तुम्हाला आमचा टीडीआर द्यायचा लोकांना. कोर्टाने निर्णय दिलाय, दोन्ही पक्षांनी एकत्र बसून वाद सोडवावा. यात महापालिकेला कोणताही अधिकार नाहीये. तरीसुद्धा बळजबरी करतात. कोण आहे त्यांच्या पाठीमागे? बेकायदेशीर स्वत: वागायचं आणि आम्हाला हेलपाटे घालायला लावायचे. वयाच्या ८० व्या वर्षीही स्वत:च्या हक्कासाठी झगडावं लागत आहे. मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतीयांना द्यायचं, असं म्हणतउषा चव्हाणयांची उद्विग्नता व्यक्त केली आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी सरकारवर टीका केली असून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

तसंच दुसरी एक पोस्ट शेअर करत उषा चव्हाण यांनी प्रशासनाकडून त्यांना आलेले पत्र शेअर केले आहे.हे शेअर करताना त्यांनी लिहिलं की, आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते, तर माझा १/३ हिस्सा मला सुरक्षित शब्द देऊन दिला गेला असता. आज दबाव आणून मला त्रास देण्यात येत आहे.

Maharashtra TimesAmrapali Dubey : लग्नाआधीच मुलगी दत्तक घेण्याच्या निर्णयावर वडिलांची नाराजी, समाजाचं कारण, अभिनेत्रीला आलं रडू
पण माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे लक्षात ठेवत आज मी ७५ प्लस आहे, तरीही माझ्या हक्कासाठी आंदोलन करेन आणि मला न्याय मिळेपर्यंत लढत राहीन.जय भवानी! जय शिवाजी! हर हर महादेव!

नेमका काय आहे वाद?

पुण्याच्या धनकवडी भागातील उषा चव्हाण यांच्या कौटुंबिक मालकीच्या जागेचा वाद गेल्या २६ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. उच्च न्यायालयानं उषा चव्हाण यांच्या मुलाचा (हृदयनाथ) या मालमत्तेत कायदेशीर हिस्सा असल्याचं मान्य केलं होतं. तरीही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी विकासकाच्या (बिल्डर) फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीनं टीडीआर (TDR) मंजूर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

शासकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचं पाहून उषा चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.

न्यायालयीन आदेश असूनही जर आमचे हक्क सुरक्षित राहत नसतील, तर मिळालेल्या सन्मानांचं मूल्य काय?”असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारने दिलेले सर्व शासकीय पुरस्कार व मानचिन्हे ठाण्यातील दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी ठेवले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप आणि तात्पुरती स्थगिती

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप केला होता. यानंतर धनकवडी इथल्या विवादित टीडीआर व्यवहाराला उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. नगरविकास विभाग आणि नगररचना अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी करून स्वतंत्र सुनावणी घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.

उषा चव्हाण यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्यावर अथवा त्यांच्या कुटुंबावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं..

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत