Headlines

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ जिंकूनही ‘हरला’, नेमकं काय चुकतंय? रविवारी शेवटची संधी


Womens Team India : महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा ५ विकेटने पराभव केला. हा सामना भारताने जिंकला असला तरी पराभव झाल्यासारखा आहे, भारताच्या महिला खेळाडूंनी इतक्या चुका केल्या की बांगलादेशच्या जागी दुसरा कोणता तगडा संघ असता तर भारतासाठी विजय मिळवणं सोपं झालं नसतं.

IND W vs BAN W Match Result
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताने वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत गुरुवारी गट क्रमांक एकच्या लढतीत बांगलादेशचे आव्हान पाच विकेट आणि १९ चेंडू राखून परतवून लावले. यामुळे उपांत्य फेरीच्या दृष्टिने भारताचे आव्हान कायम राहिले. या विजयातही सुमार कामगिरीची सल मात्र हरमनप्रीतच्या टीम इंडियाला राहणार आहे. भारतीय संघाला लवकरात लवकर सुधारणा करावी लागणार आहे. कारण पुन्हा एकदा भारत जिंकूनही हरल्यासारखं आहे. हरमनप्रीत अँड कंपनीसमोर कठीण पेपर आाली तेव्हा त्यांनी सपशेल नांगी टाकली हे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दिसून आलं. काल गुरूवारी झालेल्या सामन्यातही हेच घडलं पण भारतासाठी हे धोक्याचं ठरू शकतं. कारण बांगलादेशविरूद्धही त्याच चुका ज्यामुळे आफ्रिकेविरूद्धचा सामना गमवावा लागला होता. बांगलादेश असल्याने त्याचा फार काही फटका बसला नाही. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात असंच सुरू राहिलं तर भारताला सेमी फायनलचं तिकिट मिळणं अवघड होईल.

नेमकं काय चुकतंय?

ढिसाळ क्षेत्ररक्षण करताना भारतीयांकडून चार सोपे झेल सुटले. स्वैर माऱ्यामुळे अवांतर धावांची खैरात (सात वाइटसह १० धावा) वाटली गेली. त्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीयांनी बेजबाबदार फलंदाजी केली. उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी दक्षिण आफ्रिकेशी चुरस असतानाही भारतीय फलंदाजांकडून निव्वळ धावगती आणखी उंचावसाठी पुरेसे प्रयत्नच झाले नाहीत. स्मृती मानधना (८), रिचा घोष (१०) या धावगती उंचावण्याची भूमिका बजावणाऱ्या फलंदाज अपयशी ठरल्या.
Maharashtra TimesINDW vs BANW News : मॅच तर जिंकली पण फिल्डिंगमध्ये टीम इंडिया अक्षरशः ढेपाळली, 10 बॉलमध्ये 4 कॅच कोणाकडून ड्रॉप? हरमनप्रीत काय म्हणाली?

खराब क्षेत्ररक्षण, झेल सुटणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवातही भारताला खराब क्षेत्ररक्षण महागात पडले होते. या सामन्यातही स्थिती आणखी चिंताजनक होती. भारतीय क्षेत्ररक्षकांकडून पॉवरप्लेमध्येच चार सोपे झेल सुटले. नंदनी शर्माकडून दोन, तर यास्तिका भाटिया आणि राधा यादव यांच्याकडून प्रत्येकी एक झेल सुटला. गेल्या सामन्यातही राधाचे (दोन झेल सुटले) क्षेत्ररक्षण ढिसाळ होते.
Maharashtra TimesINDW vs BANW : कॅच सुटले पण मॅच नाही! भारताने बांगलादेशला नमवलं, सेमीफायनलच्या आशा कायम, कोण ठरलं विजयाचा शिल्पकार?

तीनवेळा जीवदान

स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्यानंतर भारतासाठी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित दोन्ही लीग सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. भारताच्या सुमार त्याआधी क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत बांगलादेशने ८ बाद १३६ धावा केल्या. याचा सर्वाधिक फायदा बांगलादेशची सलामीची फलंदाज जुयैरिया फिरदौस (३३) हिने घेतला. तिला पाचव्या षटकापर्यंत तीनवेळा जीवदान मिळाले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा