Headlines

हसता हसता अंतर्मुख करणारी के.के. मेमन यांची ‘आदर्श बाल विद्यालय’


विनय उपासनी
पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर आणि एकूणच देशातील वातावरण तरुणांच्या आंदोलनानं भारून गेलं असतानाच केंद्र सरकारकडून हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसी अत्याचार कसा करण्यात आला, याच्या कहाण्या, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर गरागरा फिरवल्या जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या शिक्षण क्षेत्राविषयी त्यानिमित्तानं भरभरून बोललं आणि लिहिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘ आदर्श बाल विद्यालय ‘ ही वेब सीरिज समयोचित ठरते.

सरकारी शाळांची दुरवस्था, शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, राजकारणाचा हस्तक्षेप आणि शिक्षकांसमोरील आव्हानं हा विषय अनेकदा चित्रपट आणि मालिकांमध्ये हाताळला गेला आहे. मात्र ‘आदर्श बाल विद्यालय‘ ही सीरिज या गंभीर विषयाला विनोद, व्यंग आणि भावनिक प्रसंगांची जोड देत प्रेक्षकांसमोर आणते. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही, तर शिक्षणव्यवस्थेतील वास्तवावरही नेमकं भाष्य करते मालिकेची कथा राजधानी दिल्लीच्या उपनगरातील एका मोडकळीस आलेल्या सरकारी शाळेभोवती फिरते. विद्यार्थीसंख्या घटलेली, अपुऱ्या सुविधा, प्रशासनाची उदासीनता आणि शाळेचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान अशा अनेक समस्यांनी ही शाळा वेढलेली आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी ( के. के. मेनन ) आणि शिक्षकांची टीम शाळेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू करते. या प्रवासात अनेक हास्यास्पद प्रसंग घडतात, तर काही प्रसंग शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात. के. के. मेनन यांनी साकारलेली मुख्याध्यापकाची भूमिका मालिकेचा सर्वात मोठा आधार आहे. त्यांच्या सहज, संयमी आणि प्रभावी अभिनयामुळे पात्राला वास्तवाची किनार मिळते. गंभीर प्रसंग असो किंवा हलकाफुलका विनोद, प्रत्येक प्रसंगात त्यांनी उत्कृष्ट संतुलन राखलं आहे. अर्चना पूरन सिंह आणि नवीन कस्तुरिया यांच्यासह इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या असून कलाकारांमधील संवाद आणि टायमिंग मालिकेला अधिक रंगतदार बनवतात.

Maharashtra TimesKangana Ranaut on Gen Z:’जनरेशन गटार’; मद्यपान, अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध; कंगना रणौतची जेन झी तरुणींवर तिखट शब्दांत टीका
दिग्दर्शकानं कथानकाला वेगवान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक भागात नवा संघर्ष आणि त्यावरचा उपाय दाखवताना प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. सुरुवातीला रटाळ, संथ वाटणारी ही सात भागांची सीरिज नंतर मनाची पकड घेते, हे खरं. मालिकेतील संवाद अनेक ठिकाणी मिश्कील आहेत, तर काही संवाद थेट शिक्षणव्यवस्थेतील विसंगतींवर बोट ठेवणारे आहेत. त्यामुळे मनोरंजनासोबतच सामाजिक आशयही ठळकपणे समोर येतो.

तांत्रिकदृष्ट्याही मालिका समाधानकारक आहे. शाळेचं वातावरण, पार्श्वसंगीत आणि छायांकन कथेला पूरक ठरतं. काही भागांमध्ये कथानक थोडं संथ वाटतं आणि काही प्रसंग अपेक्षेपेक्षा अधिक नाट्यमय भासतात. मात्र, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचं, मग ते अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे का असेना, वर्तन खटकणारं वाटतं. कोणत्या शाळांमध्ये एवढे उद्धट, तिरसट आणि बावळट विद्यार्थी असतात, हा एक संशोधनाचा विषय ठरावा.

Maharashtra TimesJr NTR Injury: ज्युनियर एनटीआर सिनेमाच्या सेटवर जखमी, २ महिने विश्रांतीचा सल्ला; तर सर्जरीनंतर राम चरणच्या तब्येतीचे अपडेट समोर
आजच्या काळात सरकारी शाळा, शिक्षणाचा दर्जा आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा सुरू असताना, शालेय शिक्षणासाठी अधिकाधिक तरतूद असणं किती गरजेचं आहे, याचं वास्तव अधोरेखित करणारी ‘आदर्श बाल विद्यालय’ सीरिज हा विषय प्रेक्षकांसमोर सहज आणि समजण्यासारख्या पद्धतीनं मांडते. एकूणच, विनोद, संवेदनशीलता आणि सामाजिक आशय यांचा समतोल साधण्यात ‘आदर्श बाल विद्यालय’ यशस्वी ठरते. हसताहसता अंतर्मुख होण्यास उद्युक्त करणारी ही सीरिज कुटुंबासह पाहण्यासारखी नक्कीच आहे.

वेब सीरिज: आदर्श बाल विद्यालय

ओटीटी: अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
कलाकार: के. के. मेनन, अर्चन पूरन सिंह , नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिश्त, अभिमन्यू सिंग, देवेन भोजानी
दिग्दर्शक : हिमांक गौर
दर्जा: ★★★

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत