Akola missing children Case : अकोला येथे एका पंधरा वर्षाचा मूकबधिर बालक हरवला होता. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांने या मुलाचे पालक शोधण्यात यश आले.

बालकाचा आधार क्रमांक उपलब्ध झाला
पुढील कार्यवाहीसाठी महा-आयटीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून आवश्यक माहिती मुंबई येथील आधार नोंदणी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर बालकाचा आधार क्रमांक उपलब्ध झाला. २९ मे रोजी बालकाला तहसील कार्यालय, अकोला येथे नेण्यात आले.
पत्ता बिहार राज्याचा
तेथील ऑपरेटर सतीश पडघन यांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर बालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली. संबंधित बालकाचा पत्ता बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यातील मणियारी येथील असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर बालक पुन्हा आपल्या घरी पोहोचला.
हरवलेला, बोलता-ऐकता न येणारा आणि स्वतःचा पत्ता सांगू न शकणारा एक १५ वर्षांचा बालक अखेर पुन्हा आपल्या घरी पोहोचला. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेच्या प्रभावी वापरामुळे या मूकबधिर बालकाचे बिहार राज्यात असलेले कुटुंब शोधण्यात यश आले.
पालकांविना एकटाच फिरताना आढळला
काही दिवसांपूर्वी हिवरखेड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना एक मूकबधिर बालक पालकांविना एकटाच फिरताना आढळून आले. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले. बालकाची अवस्था पाहून त्याचे कुटुंब शोधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
सांकेतिक भाषेद्वारे संपर्क
बालकाचा पत्ता आणि कुटुंबाचा शोध घेण्यासाठी बाल कल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय मूकबधिर विद्यालयातील शिक्षिकांच्या मदतीने सांकेतिक भाषेद्वारे बालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यातून आवश्यक माहिती मिळू शकली नाही.
व्हिडिओ कॉलद्वारे पालकांशी संपर्क
आधार नोंदणीत नमूद मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांशी समन्वय साधून बालकाच्या पालकांचा संपर्क क्रमांक मिळविण्यात आला. यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे बालकाचा त्याच्या पालकांशी संपर्क घडवून आणण्यात आला. अनेक दिवसांनंतर एकमेकांना पाहताच बालक आणि त्याचे पालक गहिवरले.
कुटुंबीयांच्या भावना अनावर
प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे हरवलेल्या लेकराचा शोध लागल्याने कुटुंबीयांच्या भावनाअनावर झाल्या. २९ जुलै २०२६ रोजी बालकाचे वडील अकोला येथे आले. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत बालकाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले

