Gautam Gambhir News : भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीपूर्वी गंभीरने पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. याशिवाय त्याने एका कारणावरुन नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नेमकं काय म्हणाला गंभीर?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा आपल्या रोखठोक शैलीत बोलताना पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेत गंभीरने सोशल मीडियावरील टीका, संघाची कामगिरी, दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि खेळाडूंच्या दुखापती अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे हे माझे काम नाही’, असे म्हणत त्याने टीकाकारांना थेट उत्तर दिले.
‘ट्रॉफी जिंकणं माझं काम’
सोशल मीडियावरील टीकेबाबत गंभीर म्हणाला, “माझं मुख्य काम ट्रॉफ्या जिंकणं आहे, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणं नाही. लोकांना खूश ठेवणं हे माझं काम नाही.” टीम इंडियाच्या सध्याच्या स्थितीवरही त्याने भाष्य केले. भारतीय संघ सध्या नव्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे क्रमवारीतील चढ-उतारांकडे फारसे लक्ष देत नसल्याचे गंभीरने स्पष्ट केले. इंग्लंड दौऱ्यानंतर संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याचेही त्याने सांगितले.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर गंभीरने नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, कसोटी मालिका किमान तीन सामन्यांची असायला हवी. कारण पहिलाच सामना गमावल्यानंतर दोन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमनाची संधी जवळपास संपते. यावेळी गंभीरने ऑस्ट्रेलियातील मालिकेचे उदाहरण दिले. भारत ०-१ ने पिछाडीवर असतानाही तीन सामन्यांच्या मालिकेमुळे पुनरागमन करून मालिका २-१ ने जिंकू शकला, असे त्याने सांगितले.
प्लेइंग 11 मध्ये बदल होणार?
खेळाडूंच्या दुखापतींबाबतही गंभीरने चिंता व्यक्त केली. या मालिकेत अनेक प्रमुख खेळाडू उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले. संघातील सर्वोत्तम खेळाडूंनी अधिकाधिक क्रिकेट खेळणे आणि सातत्य राखणे गरजेचे असल्याचे गंभीर म्हणाला.
कुलदीप सलग दोन दिवस सरावासाठी उपस्थित नसल्याने त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसेच ध्रुव जुरेलच्या जागी सर्फराज खानला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा