आजपासून पुन्हा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवात होतेय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जरांगेंनी सरकारला आव्हान दिले आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं, चर्चा केली. मात्र तरीही जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आंदोलन होणारच आणि तेही कडक उन्हात, असा इशारा जरांगेंनी दिलाय.