Mumbai Viral Fever: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये या आजारांचा त्रास अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यानंतर जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे दरवर्षी दिसून येते. यंदाही ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू आणि टायफॉइडच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही रुग्णांमध्ये तापासोबत खोकला, थकवा, हातपाय दुखणे आणि पोटदुखी अशी मिश्र लक्षणे आढळत आहेत.
Uddhav Thackeray: प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा का? उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला प्रश्न
फिजिशियन डॉ. एन. एम. मोरे यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांत व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः २२ ते ५५ वयोगटातील रुग्णांमध्ये हा संसर्ग अधिक आढळून येत आहे. वैयक्तिक स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सर्दी-खोकल्याची लक्षणे असल्यास गर्दी टाळणे, नियमित अंतराने पुरेसे पाणी पिणे आणि ताजे, गरम अन्न सेवन करणे, असा सल्लाही त्यांनी दिला.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
– ताप दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– घशात खवखव आणि सतत खोकला
– तीव्र अंगदुखी व अशक्तपणा
– तीव्र पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या दम्याचा त्रास वाढणे
– रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणाबाहेर जाणे
– डेंग्यूची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे
Ashwini Bhide: अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई, नेमकं काय घडलं?
मुलांमध्येही व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढले
व्हायरल ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्येही वाढल्याने बालरुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित लसीकरण पूर्ण करणे, स्वच्छ पाणी पिणे आणि दूषित अन्न टाळणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

