तब्बल 318 वर्षांनंतर जालना शहरात श्री संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती हा अभूतपूर्व भक्ती सोहळा भक्तिरसाने भारावून गेला होता. या रिंगण सोहळ्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं दर्शन जरांगेंनी घेतलं. या निमित्ताने बळीराजाला सुखी समाधानी होऊ दे, असं साकडंही त्यांनी घातलं.