Headlines

भर पावसाळ्यात मराठवाड्यात पोहचले पाण्याचे ११४ टँकर; तहानलेल्या गावांना टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा


Chhatrapati Sambhajinagar News: ऐन पावसाचे दिवस चालू असाताना मराठवाड्यात मात्र कित्येक गाव पाण्यासाठी तहानलेली आहेत. जुलै संपला तरी पावसाने मात्र मराठवाड्यात पाहिजे तशी उपस्थिती दर्शवलेली नसल्याने भर पावसात ११४ टँकर द्वारे गावांना टप्प्याटप्प्याने पाणी पुरवले जात आहे.

भर पावसाळ्यात टँकरचे पाणी मराठवाड्यात
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा वगळून मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १८ ऑगस्टच्या अहवालानुसार, एकूण ४४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात ३०, बीड २०, लातूर २१०, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तहानलेल्या गावांना ट्रँकरद्वारे पाणी

निम्मा जुलै महिना संपला तरी मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच आहे. आजघडीला छत्रपती संभाजीनगरसह अन्य तीन जिल्ह्यांतील मिळून एकूण ५१ गावे आणि ४८ वाड्यांना ११४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय मराठवाड्यात ४४३ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालया प्रशासनातर्फे देण्यात आली. तर उर्वरित चारही जिल्हे टँकरमुक्त आहेत.

जिल्हे टँकरमुक्त होतील अशी अपेक्षा पण अपेक्षाभंग

उन्हाळा सुरू होताच यंदाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टप्प्याटप्प्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल आणि जिल्हे टँकरमुक्त होतील, अशी अपेक्षा होती.

जूननंतर देखील टँकरचा आधार

परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत ९२ गावे, ३६ वाड्यांना १५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त नव्हता.

Maharashtra TimesGirish Mahajan Nashik:सहा महिन्यांत नाशिकचा कायापालट; पालकमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिमध्ये , महाजन यांनी केला विश्वास व्यक्त

३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता

जूनअखेर छत्रपती संभाजीनगरातील टँकर बंद करण्यात आले होते; परंतु ग्रामस्थांनी मागणी केल्याने टँकर पुन्हा सुरू करावे लागले. १४ जुलैदरम्यान विभागातील तहानलेल्या गावांना ३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.

पावसाने खंड दिल्याने टंचाई जाणवत आहे

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली. छत्रपती संभाजीनगरसह परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हेदेखील टँकरमुक्त झाले. पावसाने खंड दिल्याने टंचाई जाणवत आहे.

Maharashtra TimesMumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा दिलासा; सहा फुटांवरील गणेशमूर्तींच्या नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाला तूर्त परवानगी

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा वगळून मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १८ ऑगस्टच्या अहवालानुसार, एकूण ४४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये जालना जिल्ह्यात ३०, बीड २०, लातूर २१०, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा