Ind vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी २८८ धावांवर मजबूत स्थितीत असलेल्या टीम इंडियाची नजर आता मोठ्या धावसंख्येवर आहे. दुसऱ्या दिवशी पडिक्कल-पंतसमोर मोठी जबाबदारी असेल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीच्या दुसऱ्या दिवशीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन वेळा पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे १७ षटके कमी टाकली गेली. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या दिवशीचा सामना १५ मिनिटे आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या दिवशी सामन्याची वेळ सकाळी १०:०० वाजताची होती, मात्र आता दुसऱ्या दिवशीचा खेळ सकाळी ९:४५ वाजता सुरू होईल. तसेच, नुकसान भरून काढण्यासाठी दिवसभरात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने गॉलच्या खेळपट्टीवर स्वतःला अत्यंत मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. गॉलमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे नेहमीच कठीण असते, हे लक्षात घेत भारताने पहिल्याच दिवशी केवळ २ गडी गमावून २८८ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट करण्यासाठी आणि श्रीलंकेला सामन्यातून बाहेर ढकलण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ६०० धावांचा टप्पा ओलांडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
पडिक्कल आणि पंत सांभाळणार मोर्चा
पहिल्या दिवशी भारतीय डावाचे सर्वात मोठे आकर्षण युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल ठरला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १७८ चेंडूत १३१ धावांची ऐतिहासिक आणि नाबाद खेळी केली. दुसऱ्या दिवशी पडिक्कल भारतीय डावाला पुढे नेईल आणि त्याला साथ देण्यासाठी आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत क्रीझवर उपस्थित असेल. हे दोन्ही फलंदाज मिळून भारताला एका विशाल धावसंख्येवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
पहिल्या दिवशी ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीला उतरण्याची दाट शक्यता आहे. क्रॅम्प्सचा सामना करत असलेल्या राहुलच्या फिटनेसमध्ये आता सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, पहिल्या दिवशी विकेटसाठी तरसलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांना दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात पुनरागमन करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण भारतीय फलंदाज खेळपट्टीवर पूर्णपणे स्थिरावलेले दिसत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा