Headlines

नागपुरात युवकाने संपवलं जीवन; पोलिसांवर नागरिकांचा गंभीर आरोप; दोन पोलिसांची बदली


Nagpur News: नागपूर येथे खापा घुडण मध्ये जालालखेडा पोलीस ठाण्यातील . वाळू तस्करीच्या गुन्ह्याची ही घटना आहे. चौकशीसाठी बोलवताच आरोपी बेपत्ता झाला. आणि नातेवाईकांनी शोध घेताच आरोपीचा मृतदेह आढळला

_ crime
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा घुडण येथील भगवान किसान मनमोडे (वय ३५) या युवकाच्या आत्महत्येने गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांच्या दबावामुळे भगवानने आत्महत्या केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जलालखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम काकडे आणि पोलिस अंमलदार रवींद्र मोहोड,अशी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

वाळू तस्करीचा गुन्हा दाखल आणि आणि युवकाने संपवल जीवन

२१ मे रोजी भगवान याच्याविरूद्ध वाळू तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्राली जप्त केली. ही ट्रॉली भगवानच्या नातेवाइकाची होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलाविले. पोलीस त्याच्या हाताचे ठसे घेणार होते. परंतु तो आला नाही. याचदरम्यान १० जुलैला तो बेपत्ता झाला. नातेवाइकांनी शोध घेतला असता आढळून आला नाही. १२ जुलैला विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांच्या दबावामुळे भगवानने आत्महत्या केल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखवून अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी काकडे व मोहोड यांना पोलिस नियंत्रण कक्षात संलग्न केले. सावनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. त्याच्यावर पोलिसांचा दबाव नव्हता. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येत असून अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी दिली. भगवान याच्याविरूद्ध २०२३मध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल असल्याचे कळते.

Maharashtra TimesNashik News: चिखलमय महामार्गावर ‘आपटी’! शंभरावर दुचाकी घसरुन अनेकजण जायबंदी, थेट रुग्णवाहिका तैनात करण्याची वेळ

पोलीसांची केली बदली

नागपूरमध्ये जाललखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खापा घुडण येथील भगवान किसान मनमोडे याने पोलिसांच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळेच जाललखेडा पोलिस ठाण्यातील संबंधीत घटनेशी असलेले पोलिसांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.पोलीस नियंत्रण कक्ष म्हणजे कमांड सेंटर ,मुख्य ऑफिस आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai : सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; चुकीच्या इंजेक्शनमुळे बळी गेल्याचा आरोप, समितीच्या अहवालात वेगळंच कारण समोर

नागपूरात या आधी देखील आत्महत्येचे प्रकार

विविध ठिकाणी ऑटोचालकासह पाच जणांनी आत्महत्या केल्या. पहिली घटना भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळशीनगर येथे उघडकीस आली. ऑटोचालक उमेश कुमार उईके याने कौटुंबिक कलहातून गळफास घेतला. इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंदननगर परिसरात अजय गौतम तडया याने जीवन संपविले. तो मनोरुग्ण होता. त्याचप्रमाणे मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरती टाउन परिसरात संजय अन्नीलाल उईके याने झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच दोन घटना घडल्या.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा