IND vs SL Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत नंबर-३ वरील भारताचा प्रदीर्घ दुष्काळ संपवला. या शतकासह पडिक्कलने कोणते मोठे विक्रम केले?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या फलंदाजीचा असा काही डंका वाजवला आहे की, क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या पडिक्कलने या संधीचे सोने करत १७८ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १३१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली.
१५० वर्षांच्या इतिहासात पहिलाच भारतीय
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात आजवर एकाही भारतीय फलंदाजाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नव्हते. पडिक्कलने गॉलच्या मैदानावर शतक पूर्ण करताच स्वातंत्र्यदिनी शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा अनोखा आणि ऐतिहासिक मान मिळवला.
या ऐतिहासिक शतकासोबतच पडिक्कलने २१ व्या शतकात (२००१ पासून) एका खास विक्रमाची नोंद केली आहे. २१ व्या शतकात भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर (No. 3) फलंदाजी करताना शतक झळकावणारा तो केवळ दुसराच डावखुरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिल्ली कसोटीत जिम्बाब्वेविरुद्ध १३६ धावांची खेळी करत हा पराक्रम केला होता. गांगुलीनंतर तब्बल २४ वर्षांनी पडिक्कलने ही किमया करून दाखवली आहे.
तसेच, संपूर्ण भारतीय कसोटी इतिहासात नंबर-३ वर शतक ठोकणारा तो एकंदरीत ८ वा डावखुरा फलंदाज बनला आहे. याआधी विनोद कांबळी (४ शतके), सौरव गांगुली (३ शतके), सलीम दुर्रानी, बापू नादकर्णी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर आणि सुरिंदर अमरनाथ या दिग्गजांच्या यादीत आता पडिक्कलचे नाव जोडले गेले आहे.
नंबर-३ च्या शतकाचा दुष्काळ संपला
भारतीय संघासाठी नंबर-३ वर शेवटचे कसोटी शतक सप्टेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शुभमन गिलने झळकावले होते. त्यानंतर सलग १९ कसोटी सामन्यांमधील ३५ डावांमध्ये भारताने तिसऱ्या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना आजमावले होते. मात्र, त्यांना केवळ २७.२८ च्या सरासरीने ५ वेळाच पन्नासपेक्षा जास्त धावा करता आल्या होत्या. पडिक्कलने हे खणखणीत शतक ठोकून नंबर-३ वर असलेला प्रदीर्घ दुष्काळ संपवला आहे आणि भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा