Headlines

त्या पुलांच्या अस्वस्थ गोष्टी – mumbai marine drive flyover maharashtra times article


मुंबईत आताचा सिंदूर पूल आणि पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिजने भाऊचा धक्का व बंदर परिसराशी मुंबई जोडली. भाऊ ऊर्फ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी उभारलेल्या या बंदर परिसराला भाऊंनी स्वतःच तत्कालीन उगवते गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांचे नाव सुचविले होते.

Mumbai Marine Drive Flyover
मुंबई मरीन ड्राइव्ह फ्लायओव्हर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
समीर कर्वे

गजबजलेल्या प्रिन्सेस स्ट्रीटवरून एक झोकदार वळण घेत उजवीकडे उतरल्यावर अरबी समुद्राचे नयनरम्य दर्शन मुंबईत होत असे. आज सागरी मार्गाच्या पोटात शिरण्याची उत्कंठा असली, तरीही मरीन ड्राइव्हचा फ्लायओव्हर आजही प्रत्येकाला खुणावत असतो. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटात अमिताभ बच्चनवर चित्रित केलेल्या गाण्यात या पुलाचे सुंदर दर्शन घडते. मुंबईतील अनेक पूल हे वर्षानुवर्षे असे वेगवेगळ्या रोचक गोष्टींची गाथा बनून राहिले आहेत.

मुंबईत आताचा सिंदूर पूल आणि पूर्वाश्रमीचा कर्नाक ब्रिजने भाऊचा धक्का व बंदर परिसराशी मुंबई जोडली. भाऊ ऊर्फ लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांनी उभारलेल्या या बंदर परिसराला भाऊंनी स्वतःच तत्कालीन उगवते गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांचे नाव सुचविले होते. फ्रेअर, रे रोड, एलफिन्स्टन रोड अशा अनेक गव्हर्नरांच्या नावे मुंबईत पूल उभारले गेले. ऑपेरा हाऊस परिसरात फ्रेन्च व केनेडी या रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावे उभारलेले पूल आजही वापरात आहेत. भायखळ्याचा इंग्रजी एस आकाराचा पूल असेल किंवा १९२६ च्या काळात दादरला उभारलेला टिळक पूल अशा अनेक पुलांनी मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. पुढे १९७३ च्या सुमारास वाशीमध्ये ठाणे खाडीवर पूल उभा राहिल्याने नवी मुंबई व मुख्य मुंबई बेट यांच्यात दुवा सांधला गेला. शिवडी-न्हावाशेवा किंवा रेवस-करंजा पुलाच्या गोष्टी १९८० च्या दशकापासून ऐकायला मिळायच्या. वांद्रे-वरळी आणि अटल सेतूने खोल समुद्रात अभियांत्रिकी कौशल्याची किमया सिद्ध केली आणि मुंबईला वेगावर स्वार केले. महात्मा फुले मंडई ते हॉस्पिटलपर्यंतच्या उड्डाणपुलाने अत्यंत दाटीवाटीच्या महम्मद अली मार्गावरही पूल उभारला जाऊ शकतो, या जिद्दीचे व जनतेच्या सहिष्णुतेचे दर्शन घडविले. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ५५ पुलांचे शिवधनुष्य रस्ते विकास महामंडळाने पेलले.

पुलांची संख्या वाढू लागली तसे काही जटिल प्रश्नही उभे ठाकले. अंधेरीच्या गोखले पुलाच्या उभारणीत तब्बल साडेसहा फुटांनी अंदाज चुकला. कितीही सारवासारव झाली, तरी भाईंदरचा पूल चार लेनवरून अचानक दोन लेनपुरता निमुळता झाला, हे सत्य कुणीच पचवू शकले नाही. डोंबिवलीतील पलावा पूल उद्घाटनापासून अवघ्या सात दिवसांत दुचाकीस्वारांसाठी कर्दनकाळ ठरला. चिपळूणचा बहादूरशेख नाक्यावरचा पूल उभारणीपूर्वीच कोसळला. बाकी कुठे स्लॅब कोसळणे, खड्डे पडणे, सांधे फाटणे हे प्रकार तर नित्याचेच. कामांमधला विलंब हाही ठरलेला.

या सर्व जटिल समस्यांच्या कारणांवर सर्व यंत्रणा व त्यातील अभियंत्यांनी एकत्रित विचारमंथन गरजेचे ठरते. मुंबई महापालिका, रेल्वे, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम खाते या सर्व यंत्रणा महामुंबईत पूलउभारणीची कामे करतात किंवा प्रत्येक पुलाशी त्यांचा संबंध येतो. पूर्वी त्यांच्या एकत्रित बैठका होत असत. त्यात नागरी तज्ज्ञांचे प्रतिनिधित्वही असे. रेल्वेची वर्दळ तर नेहमीचीच, परंतु पुलाच्या कामासाठी रेल्वे वाहतूक नियमन महिनोन् महिने थांबून राहू शकत नाही. अशा वेळांची जुळवाजुळव महत्त्वाची ठरते. पालिका सभांमध्ये एलवन म्हणजेच सर्वात कमी बोलीच्या निविदेसाठी आग्रह धरायचा आणि निविदा बहाल करताना मात्र कंत्राटदारांच्या खिशात हात घालायचा. अशा दुटप्पी व्यवहारांना सरावलेले कंत्राटदार प्रत्यक्ष कामातील खर्चाला कात्री लावतात. अशा झुंजीत कामे बहाल करताना भरपूर वेळकाढूपणा होतो; परंतु काम सुरू झाल्यावर मात्र उद्घाटनाच्या तारखेनुसार उलटी गणती करून पूल लवकर खुला करण्यासाठी पिच्छा पुरवला जातो. आयटी क्षेत्राची चलती सुरू झाल्यापासून सिव्हिल इंजिनीअरिंगकडे ओढा कमी झाला, त्यामुळे कुशल अभियंत्यांची वानवा असते. पुलांच्या निगराणीची भिस्त केवळ सल्लागारांवर उरते. पूल उभे राहिल्यावर अनेक दोष उघड होतात. पुलावरून वाहने सुसाट जातात; परंतु पूल उतरल्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे वाहतूक व्यवस्थापन केले जात नाही. त्यामुळे पुलांचे लाभ मिळत नाहीत. एकदा का पूल उभे राहिले की त्याखालच्या रस्त्यांना तर कधीच कुणी वाली नसतो. अशा या पुलांच्या अस्वस्थ करणाऱ्या चित्तरकथा…

sameer.karve@timesofindia.com

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा