ठाण्यात क्लस्टरविरोधात हजारो नागरिर रस्त्यावर उतरले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हजारो आंदोलक क्लस्टर कार्यालयावर धडकले. यावेळी आंदोलकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर पुनर्विकास योजना राबविण्यासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनीसह शहरात एकूण क्लस्टर पुनर्विकासाचा कारभार नियोजनशून्य सुरु असल्याचा आरोप करत गुरुवारी ठाणे शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या धडक मोर्चात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीन हात नाका ते क्लस्टर पुनर्विकास कार्यालयावर धडक दिली. पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारल्याचा आरोपही होत असतानाच प्रशासनाला या प्रकल्पातील दिरंगाई आणि अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने या प्रकल्पावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सत्ताधारी भाजपचाही विरोध
ठाण्यात क्लस्टरची अंमलबजावणी ‘क्लस्टर विकास कंपनी’ला देण्याच्या ठरावाला सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केल्याचा आरोप या दोन पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केला. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरविण्याचा अधिकार पालिकेऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करीत हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चेकऱ्यांनी हातात क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते. तीन हात नाक्यावरुन सुरू झालेल्या हा मोर्चाचा क्लस्टर कार्यालयावर समारोप करण्यात आला. ही कंपनी म्हणजे ‘तैनाती फौज’ असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, अशी मागणी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
आजमितीस ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. नगरसेवक निधीत कपात केली जात असताना या कंपनीच्या घशात 130 कोटी रुपये दिले जातात. म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा प्रकार गेले अनेक वर्षे ठाण्यात चालू आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. मेट्रो, रिंग रेल्वे, एका प्रकल्पासाठी तीन – तीन हजार झाडं कापतात. ठाण्यामध्ये कधी एवढी उष्णता होती का आधी? त्यामुळे ठाण्याचं वाटोळं करण्याचा हा डाव आहे, असेही आव्हाड यांनी याप्रसंगी म्हटले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना भारतीय संविधानाच्या 74 व्या घटनादुरुस्ती कायदा, 1992 नुसार कलम 243-डब्ल्यू अन्वये दिलेल्या अधिकारांचा भंग केला आहे, असा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान यांनी केला. शहरात चार हजार एकरांवर क्लस्टरच पुनर्विकास होत असताना तब्बल तीस एमएलडी पाणी टंचाई असल्याचे त्यांनी नमूद केले. या विरोधात आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार. आज सर्वसामान्य ठाणेकरांचा 12 टक्के आणि 20 टक्के मालमत्ता कर वाढवत असताना असे 130 कोटी रुपये तुम्ही एका क्लस्टरच्या एका क्लस्टरच्या कंपनीला देता? या कंपनीत कोण आहे; त्यांची नावे जाहीर करा, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा