कोकणासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड जगबुडी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे.6 मि.मी. तिची धोकादायक पातळी असून सध्या 7.40 मिमीवरून ही नदी वाहत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. खेड शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पुराच्या उंबरठ्यावर असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.