अंतरवालीत गर्दी करू नका, आता मुंबईकडे निघा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे. आता मुंबईत येणारच, असे आव्हानच जरांगेंनी राज्य सरकारला दिले आहे. तर रविवारी परभणीत झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवरूनही जरांगेंनी मोठं वक्तव्य केलं. शिंदेंचा परभणी दौरा रद्द झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.