Headlines

सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर , तिसऱ्या लग्नामुळे जीवे मारण्याची धमकी


मुंबई:बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आल्याचं समोर आलं आहे. आमिर खानच्या तिसऱ्या लग्नानंतर अनेक हिंदू संघटनांनी अभिनेत्यावर टीका करत, आंदोलनही केलं होतं. तसंच अनेक राजकीय नेत्यांनी आमिरच्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिल्यानं राजकीय वातावरणही तापलं होतं. पण आता लॉरेन्स बिश्नोई गँगनं त्याला धमकी दिल्यानंतर हे प्रकरण आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गौरी स्प्रॅट हिच्यासोबत लग्न केल्यानंतर आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप बिश्नोई गँगनं केला आहे. सोशल मीडियावरील एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिपद्वारे गँगच्या कथित सदस्यांनी आमिर खानला थेटजीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सोशल मीडिया पोस्टमधून थेट इशारा
आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) यांच्या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून ही धमकी वजा पोस्ट शेअर करण्यात आल्याचं समजतं. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “आमच्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन देशात लव्ह जिहादच्या नावाखाली आमिर खानसारखे लोक या गोष्टीला खतपाणी घालत आहेत. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही आणि याचे उत्तर लवकरच दिले जाईल. हे आमच्या सनातन धर्म आणि देशाच्या विरोधात आहे. जे लोक स्टारडमच्या नावाखाली अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा श्वास आम्ही बंद करू, असंही या धमकीत म्हटलं गेलंय.मात्र, या ऑडिओ क्लिपची आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे पडताळलेली नाही.

Maharashtra TimesHardeek Joshi : तो रिक्षाने जाईल तुला गरज आहे, दादासाठी घेतलेली बुलेट वहिनीने हार्दिकला दिली; राणादानं सांगितला भावुक किस्सा
‘लव्ह जिहाद’च्या आरोपांवर आमिरचे स्पष्टीकरण
आमिर खाननं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वांद्रे इथल्या त्याच्या घरी गौरी स्प्रॅटशी रजिस्टर मॅरेज केलं. या लग्नानंतर काही कट्टरपंथी संघटना आणि राजकीय गटांकडून त्याच्यावर टीका केली जात होती.या आरोपांना उत्तर देताना आमिर खाननं यापूर्वीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, “गौरी हिंदू नाही, ती ख्रिश्चन आहे आणि ती धार्मिक प्रथांचे पालनही करत नाही. तसेच आपलं हे लग्न ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’ (विशेष विवाह कायदा) अंतर्गत झालं असून यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक धर्मांतर झालेलं नाही, असंही आमिरनं स्पष्ट केलं होतं.

Maharashtra TimesShweta Tiwari: सोनम वांगचुक यांना पाठिंबा, पण ‘CJP’ स्वतःचा अजेंडा राबवतेय; श्वेता तिवारी कडक शब्दात टीका, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित धमकीप्रकरणी आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंवा रीतसर तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, लॉरेन्स बिश्नोई गँगचे बॉलिवूडमधील वाढतं नेटवर्क आणि यापूर्वी सलमान खानला मिळालेल्या धमक्या पाहता, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत