Headlines

‘राखी आणि राजीनामा मुबारक’:अभिजीत दिपकेंच्या 'झुरळ' राखीची जोरदार चर्चा! सोशल मीडियावर PHOTO व्हायरल




संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले असून, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिपके यांनी शेअर केलेल्या झुरळाच्या थीमवरील राखीची आणि त्यावर लिहिलेल्या मजकुराची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर या अनोख्या राखीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत झुरळाच्या आकाराची राखी दिसत असून, त्यावर ‘राखी आणि राजीनामा मुबारक’ असा लक्षवेधी मजकूर लिहिलेला आहे. फोटोमध्ये दिपके स्वतःच्या हातावर ही राखी बांधून घेताना दिसत असून, हे छायाचित्र शेअर करताना त्यांनी केवळ एका ‘स्मायली’ इमोजीचा वापर केला आहे. 5 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाची हाक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारसोबतच्या चर्चेनंतर महिनाभरासाठी आपले आंदोलन स्थगित केले होते. मात्र, आता पक्षाने पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 5 सप्टेंबरला, शिक्षक दिनाचे औचित्य साधून काढण्यात येणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व ‘नीट’ परीक्षेच्या वादानंतर कथितरित्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय करणार आहेत. यासोबतच, जुलैमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचाही या मोर्चात सहभाग असणार आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियान सध्या अभिजीत दिपके यांच्याकडून ‘स्कूल ठीक करो’ हे अभियान राबवले जात असून सरकारी शाळांची दुरवस्था हा या अभियानाचा प्रमुख मुद्दा आहे. याच अनुषंगाने कॉकरोच जनता पार्टीने सोमवारी सर्व राज्य सरकारांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे गेल्या पाच वर्षांतील सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांची स्थिती, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आणि शाळांसाठी वितरित करण्यात आलेल्या निधीची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. शिक्षणमंत्र्यांना पत्राद्वारे जाब शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात दिपके यांनी सरकारी शाळांच्या विदारक स्थितीवर बोट ठेवले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या छायाचित्रांवरून अनेक मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे, योग्य वर्गखोल्या आणि बसण्यासाठी बाके यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण झाली असली, तरी कोणत्याही मुलाला अशा अत्यंत वाईट स्थितीत शिक्षण घेण्यास भाग पाडता कामा नये; त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक मिळत आहे, अशी तीव्र खंत दिपके यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत