Abhishek Sharma News : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला कथित बदनामीकारक कंटेंट हटवण्यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टीम इंडियाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा थेट दिल्ली हायकोर्टात पोहोचला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल AI च्या मदतीने तयार करण्यात आलेला कथित खोटा आणि बदनामीकारक कंटेट हटवावा, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. सध्या अभिषेक इंग्लंड दौऱ्यावर असून भारताच्या टी-२० संघासोबत आहे. या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र, दिल्ली हायकोर्टाने तातडीने कोणताही आदेश देण्यास नकार दिला. संबंधित पोस्ट आणि त्याचे पुरावे पाहिल्याशिवाय निर्णय देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच मानहानी आणि व्यक्तिमत्त्व अधिकार या दोन गोष्टींमधील फरकही प्रत्येक प्रकरणात तपासावा लागेल, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.
पुढील सुनावणी ९ जुलैला पार पडणार
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी अभिषेकच्या वकिलांना संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट न्यायालयात सादर करण्यास सांगितलं. याचिकेत ज्या URLचा उल्लेख आहे, त्याच पोस्टचे पुरावे अतिरिक्त प्रतिज्ञापत्रासह दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, मेटाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, अभिषेकने दिलेल्या आठ URL पैकी दोन लिंक उघडतच नव्हत्या. एका लिंकमध्ये पापाराझींनी अपलोड केलेला व्हिडिओ असल्याने त्यात व्यक्तिमत्त्व अधिकारांचा मुद्दा लागू होईलच असं नाही, असंही त्यांनी म्हटलं.
मात्र, अभिषेकच्या वकिलांनी हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर एका पोस्टमध्ये अभिषेकच्या मॅनेजरचा उल्लेख त्याची गर्लफ्रेंड म्हणून करण्यात आल्याचाही मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
न्यायालयाकडे कोणती मागणी?
अभिषेक शर्माने आपल्या याचिकेत AI च्या मदतीने तयार करण्यात आलेल्या कथित बनावट पोस्ट आणि व्हिडिओंमुळे त्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारचा मजकूर तातडीने हटवावा आणि भविष्यात त्याच्या नावाचा किंवा चेहऱ्याचा परवानगीशिवाय गैरवापर होऊ नये, यासाठीही न्यायालयाने योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी त्याने केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा