Headlines

महामुंबईतील तिसरं विमानतळ, देशात पहिल्यांदाच समुद्रात उभारणार; कुठे-कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times


Third Mumbai Airport: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघर येथे महामुंबईतील तिसरं आणि देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑफशोअर एअरपोर्ट
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील कोरे या गावच्या किनाऱ्यावर देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिले.

कुठे उभारणार विमानतळ?

प्रस्तावित विमानतळाची जागा उत्तन–विरार सागरी सेतूपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सागरी सेतूचा विस्तार करून थेट विमानतळापर्यंत जोडणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यामुळे मुंबईहून विमानतळापर्यंत जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. मुंबई विमानतळापासून सुमारे ५० ते ५२ किलोमीटर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रकल्प भविष्यात राज्याच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या परिसरात असल्याने पालघर जिल्ह्याच्या शहरी विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra TimesVadhavan Port: जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैकी एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचाही आढावा घेतला. पाहणी दौऱ्यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे, पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“विमानतळ, बंदरे, रस्ते, बुलेट ट्रेन आणि इतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे येत्या काळात पालघर जिल्हा राज्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगार निर्मितीच्या केंद्रस्थानी असेल, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

वसई-विरार शहरांना जोडणारा खाडीपूल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचणी बीचवर काम सुरू असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत रस्त्यांचं नेटवर्क, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे कनेक्टिव्हिटी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास आणि मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसह अनेक गोष्टींचा आढावा घेतला. या शिवाय वसई-विरार, सफाळे, पालघर आणि बोईसरमध्ये थेट संपर्क स्थापित करण्यासाठी नारिंगी खाडीपूल उभारण्यात येतो आहे. यामुळे या शहरांदरम्यान ४० किमी अंतर कमी होणार आहे तसचं प्रवासात ४५ मिनिटं वेळ वाचणार आहे.

Maharashtra TimesVadhavan Port Highway: वाढवण बंदरासाठी आठपदरी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गला थेट जोडणार; खारफुटी तोडण्यास हायकोर्टाची मंजुरी

मुख्यमंत्र्यांकडून बंदराची लांबून पाहणी

वाढवण बंदराच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी डहाणूतील चिंचणी समुद्रकिनारी भेट दिली. यावेळी चिंचणीसह वाढवण, वरोर आणि परिसरातील गावांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त होता. वाढवण विरोधकांचे गालबोट लागू नये, म्हणूनच ५ किमी लांबून मुख्यमंत्र्यांनी स्थळपाहणी केल्याची चर्चा रंगली होती.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा