WTC 2025-27 Points Table : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत कसा पोहोचू शकतो? उर्वरित ९ कसोटी सामने, गुणतालिका आणि संपूर्ण समीकरण कसे असणार? जाणून घ्या.
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2025-27 ) गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. तरीही अंतिम फेरी गाठण्याची आशा अद्याप संपलेली नाही. उर्वरित नऊ कसोटी सामने भारताचे भवितव्य ठरवणार आहेत.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अव्वल दोन स्थानांवर आहेत. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर त्यांची स्थिती आणखी कठीण झाली असून ते आठव्या स्थानावर आहेत. भारताचे गुणांचे प्रमाण ४८.१५ टक्के आहे. त्यामुळे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता जवळपास प्रत्येक मालिकेत दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
भारताचा श्रीलंका दौरा (२ कसोटी), त्यानंतर न्यूझीलंड दौरा (२ कसोटी) आणि २०२७ च्या सुरुवातीला भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. हेच नऊ सामने भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत.
भारताने सर्व ९ सामने जिंकले तर सर्व गुणांचे प्रमाण ७४ टक्क्यांहून अधिक होईल आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आठ विजय मिळाल्यासही फायनलची संधी मजबूत राहू शकते. मात्र सात विजयांवर समीकरण इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहील.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकणे भारतासाठी जवळपास अनिवार्य मानले जात आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध किमान एक किंवा शक्य असल्यास दोन्ही सामने जिंकावे लागतील. सर्वात मोठी परीक्षा मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत असेल. या मालिकेत भारताला स्पष्ट वर्चस्व गाजवावे लागेल. कारण ऑस्ट्रेलियाला मागे टाकल्याशिवाय फायनलचा मार्ग सोपा होणार नाही.
सध्या पाहता भारताचे अंतिम फेरीचे स्वप्न जिवंत आहे. मात्र आता चुका करण्यासाठी फारशी संधी उरलेली नाही. उर्वरित प्रत्येक कसोटी सामना भारतासाठी ‘करो या मरो’सारखाच महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, भारतीय संघाने सातत्यपूर्ण विजयांची मालिका कायम ठेवली, तर डब्ल्यूटीसीफायनलचे समीकरण पूर्णपणे संघाच्या बाजूने फिरू शकते.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा