![]()
अनेक दिवस झाले! किंबहुना वर्षे उलटून गेली तरी देशाने कोणतेही मोठेआंदोलन पाहिले नव्हते.किमान जेन-अल्फाने तरी असे आंदोलन नक्कीच पाहिलेनव्हते. आता तीच जेन-अल्फा पिढी रस्त्यावर उतरलीआहे!
जेन-झीने जंतर-मंतर आणि रांचीच्या रस्त्यांवरआंदोलनाची मशाल पेटवली, तेव्हापासून जेन-अल्फाच्याअंगातही उत्साह संचारला आहे. 2013 ते 2024 दरम्यानजन्मलेल्या मुलांना ‘जेन-अल्फा” म्हटले जाते. ही मुळातशाळेत जाणारी लहान-लहान मुले आहेत. यांच्या मागण्याराजकीय नाहीत.सामाजिकही नाहीत. ती फक्त शाळेपर्यंतचा चांगला रस्ता मागत आहेत. किंवावर्गात पंखे आणि बाकांची सोय मागत आहेत. लहान काअसेना, पण ती आंदोलने करत आहेत. तीही अगदी शांततेत आणि सौहार्दाने! नुकत्याच अशा अनेक घटना घडल्या. उत्तर प्रदेशातीलफतेहपूर येथील एका सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीवीज, पंखे व पाण्याची सोय व्हावी म्हणून निदर्शने केली.यासाठी त्यांनी एआयद्वारे बनवलेल्या पोस्टर्स आणिफलकांचा वापर केला. शेवटी शिक्षण अधिकाऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले. राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची कमतरता, शाळेची पडकी इमारत आणि इतर पायाभूत सुविधांसाठी आंदोलन केले. “आम्हाला शिकण्यासाठी चांगली शाळा आणिशिक्षक द्या,” अशी त्यांची घोषणा होती. तशाच प्रकारे बिहारमध्येही सरकारी शाळेतील मुलांनी मूलभूत सुविधांसाठी निदर्शने केली. महाराष्ट्रात तर शाळेतील मुलींनी खराब रस्त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल केला. जेन-अल्फाने डिजिटल पद्धतीने आपली मागणीमांडण्याचे हे एक उत्तम उदाहरण मानले गेले. सर्वात ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील आहे. येथे चंद्रपूरच्या शाळेतील मुले हातात तिरंगा घेऊन पाच किलोमीटर दूर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. शाळेपर्यंत पक्का रस्ता तयार करावा, अशीत्यांची मागणी होती. मुलांनी तब्बल पाच तास धरणेआंदोलन केले. काही मुले तर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शिरली होती. या सर्व आंदोलनांचे वैशिष्ट्य म्हणजे, मुलांनी कुठेही राजकीय घोषणाबाजी केली नाही. त्यांनी थेट आपल्या मूलभूत मागण्यांवर लक्ष केंद्रित केलेआणि आपले आंदोलन केवळ तिथेच मर्यादित ठेवले.याचा संदेश अगदी स्पष्ट आहे – यांची लढाई सध्या तरीकोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारशी नाही. पण प्रशासनविशेषतः जबाबदार अधिकाऱ्यांनी आता सावध झालेपाहिजे. आता त्यांची मनमानी चालणार नाही.ढिसाळपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हे योग्यच आहे! देशातील अनेक राज्यांच्या भागांतआजही सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे.मुले कधी झाडाखाली बसून शिकण्यास भाग पडत आहेत तर कधीही कोसळू शकणाऱ्या जर्जर इमारतींमध्ये बसत आहेत. जबाबदार अधिकारी या शाळांची पाहणी करायला कधी जात नाहीत आणि त्यांच्या दुरुस्तीकडे लक्षही देत नाहीत. रस्त्यांची अवस्था तर अशी आहे की तिथे रस्ताआहे की खड्डा, हेच समजत नाही! अधिकाऱ्यांच्या भागातील चांगल्या आणि गुळगुळीतरस्त्यांवर दर एक-दोन महिन्यांनी पुन्हा डांबर पडते. मात्र,सर्वसामान्य जनतेच्या भागातील रस्त्यांकडे कोणी ढुंकूनहीपाहत नाही. पण आता हे असे चालणार नाही! जेन-झी नंतर आता जेन-अल्फा आपली ताकददाखवण्यावर ठाम आहे. ती आता कोणाचेही ऐकूनघेण्याच्या मनस्थितीत नाही. याचे कारण स्पष्ट आहे -त्यांची कोणतीही कमजोरी नाही. त्यांना ना इन्कम टॅक्सचीभीती आहे, ना ईडीची. या मुलांचे कोणतेही राजकीयहितसंबंध नाहीत आणि त्यांना कोणत्याही पदाची किंवाखुर्चीचा लोभ नाही. त्यामुळे त्यांच्यात कोणी फूटही पाडूशकत नाही. एका साध्या नोकरीसाठी अनेक वर्षे संघर्षआणि शेवटी निराशा पदरी पाडणाऱ्या या व्यवस्थेत 1990पूर्वी जन्मलेली माणसे जगून गेली. त्यांनी सर्व वेदना सहनकेल्या आणि आपल्या संघर्षमय आयुष्याशी तडजोडकेली. पण जेन-झी आणि जेन-अल्फाकडे तसा संयमनाही. ती सहन करत राहणाऱ्यांपैकी नाहीत! एकंदरीत, ही व्यवस्था सुधारण्याची वेळ आली आहे.अधिकाऱ्यांनी सुधारण्याची हीच वेळ आहे. वेळेत या सर्व गोष्टी सुधारल्या नाहीत, तर जेन-अल्फासर्वांनाच वठणीवर आणेल! ही व्यवस्था सुधारण्याची वेळ1990 पूर्वी जन्मलेल्यांनी सर्व प्रकारचे त्राससहन केले. संघर्षमय आयुष्य स्वीकारले.पण जेन-झी, जेन-अल्फा अन्याय सहनकरत राहणाऱ्यांपैकी नाहीत. ही व्यवस्थासुधारण्याची वेळ आहे. वेळेत सुधारणाझाली नाही, तर जेन-अल्फा सर्वांनावठणीवर आणेल.
Source link
नवनीत गुर्जर यांचा कॉलम:जेन-झीनंतर आता जेन-अल्फाची आंदोलने
