Milind Gawali Share Emotional Memory OF Mother :मराठी सिनेइंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. त्यांचा फिटनेस, डाएट पाहून अनेक नवीन कलाकारही थक्क होताना दिसतात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाइम्स टीम
‘आई कुठे काय करते’ नंतर आता ‘वचन दिले तू मला’ मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी सध्या पुन्हा प्रकाशझोतात आहेत. प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत इतक्या वर्षांनंतरही एखाद्या मालिकेच्या केंद्रस्थानी राहण्याची संधी मिळण्यामागे, साजेशा अभिनयासह तशी अनेक कारणं आहेत. पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ‘फिटनेस’!
आई-वडिलांकडून मिळालेला चांगला डीएनए, जे समोर येईल ते आनंदानं खायची सवय, मांसाहार मद्यपानाकडे असलेली पाठ, हीच आपल्या तंदुरुस्तीची त्रिसूत्री असल्याचं मिलिंद सांगतात. शक्यतो घरच्या जेवणाला त्यांचं प्राधान्य असतं; अगदी शूटिंगला जातानाही ते घरून डबा नेतात. त्यातही अनेक वर्षं जेवणातभाकरीला अढळ स्थान आहे. याशिवाय, ‘गेली २० वर्षं मी साखरेचं सेवन केलेलं नाही’, असं जेव्हा ते अगदी सहजपणे नमूद करतात, तेव्हा भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत.
Tharala Tar Mag : तुरुंगातच जावांमध्ये जुंपली! एका वाक्यात सायलीने प्रियाला केलं गार, सचिनच्या माणसाची पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक; अर्जुनच्या हाती महत्त्वाची कडी ‘साखर शरीराला ऊर्जा देत असली, तरी प्रक्रिया केलेलं हे ‘सफेद जहर’ आरोग्यासाठी हानिकारकच आहे. बैठं काम करणाऱ्यांना खरं तर साखरेची आवश्यकताच नाही’, असं मिलिंद नमूद करतात. त्यांच्या साखर न खाण्यामागे आणखी एक भावनिक कारणही आहे. ‘माझ्या आईला तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. अगदी ५००च्या घरात. तरीही ती साखर सोडत नव्हती. पण साखरेमुळे ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती. त्यावेळी तिला म्हटलं, ‘चल, मी तुला साखर सोडून दाखवतो.’ तिला ते अशक्य वाटत होतं. पण तेव्हापासून मी साखर सोडली ती सोडलीच’, असं मिलिंद सांगतात.
Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद
इतक्या वर्षांनंतरही तीच अंगकाठी, तोच उत्साह अन् तीच ऊर्जा असण्यामागचं गुपित विचारल्यानंतर, ‘तणाव हा आयुष्यातला सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यासाठी आपल्या हातात आहेत, त्याच गोष्टींवर विचार करायचा. बाकी सर्व ‘वरच्या’वर सोडून द्यायचं. तुम्ही श्रीकृष्णाच्या रथात बसला आहात. त्यामुळे कितीही महाभारत घडू दे, अखेरीस विजय तुमचाच आहे, या तत्त्वावर विश्वास ठेवला, की सर्व काही सोपं होऊन जातं’, असा मूलमंत्र ते देतात.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा