Headlines

डोंबिवलीकरांना मिळणार दोन नवे जलमार्ग, जेट्टीचं 70 टक्के काम पूर्ण; नवी मुंबई, वसईपर्यंत थेट प्रवास| Maharashtra Times


म. टा. वृत्तसेवा, कल्याण: वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून डोंबिवली-ठाणे- मीरा भाईंदर- वसई आणि दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ असे दोन जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी डोंबिवली मोठागाव येथे सुरू असलेले जेट्टीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

ठाणे पुढील स्थानकातील प्रवाशांचा वाढता भार आणि त्यामानाने अपुऱ्या लोकलफेऱ्या यामुळे होणाऱ्या गर्दीतून रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. लोकलच्या दारात लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मेरीटाइम विभागाचे मंत्री असताना जलवाहतुकीचा मुद्दा मांडला होता. मुंबई ते कोकण आणि ठाणे पुढील शहरांसाठी जलवाहतूक करण्याबाबत पर्यायाची चाचपणी सुरू करत डोंबिवलीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी काम सुरू असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वॉटर टॅक्सी हा प्रवासाचा सुखद आणि जलद पर्याय असून त्यावर काम सुरू असल्याचे सांगितले होते.

Maharashtra TimesBest Bus Strike: मुंबईकरांचे हाल, बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; काय आहेत प्रमुख मागण्या?

लवकरच पाहणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील मुख्य मुद्दा असलेल्या वॉटर टॅक्सीचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली ते ठाणे गायमुखपर्यंत पहिल्या टप्प्यातील जलप्रवास लवकरच सुरू केला जाईल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्र्यांकडून लवकरच पाहणी होणार आहे.

मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः या संपूर्ण प्रकल्पाचं निरिक्षण करत आहेत. डोंबिवली वरून सुरू होऊन ही ई-वॉटर टॅक्सी ठाणे, मिरा-भाईंदर आणि डोंबिवली, दिवा, ठाण्यापासून थेट नवी मुंबईपर्यंत दोन मार्गांवर धावणार आहे. काम पूर्ण होताच, आवश्यक सुरक्षा चाचाण्या करून हा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तिकीटांचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.

10,000 वॉटर टॅक्सी सुरू करण्याची योजना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2025मध्ये मुंबईला उपनगरांशी जोडण्यासाठी तब्बल 10,000 वॉटर टॅक्सी सुरू करण्याची योजना मांडली होती. कल्याण-डोंबिवलीपासून ते अगदी वसई-विरारपर्यंत या सेवा विस्तारण्यात येतील. त्यामुळे जलवाहतुकीद्वारे नवी मुंबई विमानतळापर्यंत 70 मिनिटांत पोहोचता येणार आहे.

Maharashtra TimesNavi Mumbai International Airport: परदेश भरारीसाठी मिळणार नवा पर्याय, नवी मुंबई विमानतळावर सुरू होणार आंतरराष्ट्रीय सेवा; तारीख समोर

राज्य सरकार सध्या मुंबई महानगर प्रदेशात 6,066 कोटी रुपये खर्च करून जलवाहतुकीचे जाळे उभारणार आहे. पण यापूर्वी सुरू असलेल्या जलमार्गांवरील सेवांना फारसे यश मिळालेले दिसत नाही आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मिरा-भाईंदरमध्ये जलमार्गाचे 340.68 किलोमीटर लांब जाळ्याचा विस्तार सुरू आहे. पण हे सर्व प्रकल्प फार खर्चिक असून तिकिटांचे दरही जादा असतात. यापूर्वीही सुरू केलेल्या काही सेवा अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आल्या होत्या.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत