Headlines

गाव दिवाळीसाठी रात्री घराबाहेर पडली; सकाळी पडीत घरात 45 वर्षीय महिला… तपासात समोर आला जावयाचा भयानक कट| Maharashtra Times


Woman found dead: नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम भागात वसलेल्या गावात एका 45 वर्षीय महिलेचा पडीत घरात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाव दिवाळी पाहण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला बेपत्ता झाली आणि तपासात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास करताच एक धक्कादायक कट उघडकीस आला आहे.

जागा वाटपावरून शिवसैनिकांमध्ये धुसफुस, पक्ष कमर्शियल झालाय? नीलम गोऱ्हेंनी सगळं सांगितलं

महेश पाटील, नंदुरबार: नंदुरबारमधील एका दुर्गम भागातील गावात घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाव दिवाळी पाहण्यासाठी गेलेली एक 45 वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर एका पडीत घरात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनेचा तपास करताच एक धक्कादायक कट समोर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

गावात गाव दिवाळी असल्याने 45 वर्षीय महिला रात्री घराबाहेर पडली. मात्र, ती घरी न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेत असताना एका पडीत घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. मयत महिलेच्या जवळच्या नातेवाईकाने मित्राच्या साथीने महिलेचे डोके सिमेंटच्या पोल वर आदळून व विटेने डोक्यात मारून खून केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Maharashtra TimesLatur News: कडाक्याच्या थंडीत व्यायामासाठी गेले, शेताकडेला अचानक कोसळले, अवघ्या 45व्या वर्षी ग्रामसेवकाचा अंत; नेमकं काय घडलं?

शहादा तालुक्यातील रायखेड येथे राहणाऱ्या शानूबाई शान्या ठाकरे (45) असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रायखेड गावात धाव घेत तपास सुरू केला होता. शानूबाई ह्या 29 डिसेंबर रोजी रात्री गाव दिवाळी पाहण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान त्या घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला होता. यादरम्यान गावातीलच विजय मंजी चव्हाण याच्या पडीक घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याचे दिसून आले होते.

घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर म्हसावद पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी लीलाबाई जामसिंग सोनवणे यांनी म्हसावद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लागलीच खुनाच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत लागलीच तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाच्या आत रवींद्र फत्या सूर्यवंशी रा.रायखेड ता. शहादा, दिलीप दशरथ भिल उर्फ सूर्यवंशी रा. जवखेडा ता शहादा यांना अटक करण्यात आली आहे.

जागा वाटपावरून शिवसैनिकांमध्ये धुसफुस, पक्ष कमर्शियल झालाय? नीलम गोऱ्हेंनी सगळं सांगितलं

तपासात आले सर्व समोर

मयत महिला ही आरोपी रवींद्र फत्या सूर्यवंशी ची आकड सासू लागत असून आरोपी हा तिला नेहमी पैसे देत होता परंतु घटनेच्या अगोदर त्याने दारू साठी पैसे मागितले परंतु तिने देण्यास नकार दिला यावरून त्यांच्यात वाद झाला होता हाच राग मनात धरून आरोपी दिलीप दशरथ भिल उर्फ सूर्यवंशी च्या मदतीने दोन्ही आरोपींनी मयत महिलेचे डोके सिमेंटच्या पोल वर आदळून आणि विटेने डोक्यात मारून खून केल्याचे तपासात समजले या प्रकरणी दोघी आरोपीवर म्हसावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी नितीन कामे हे करीत आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा