Headlines

‘इको-टुरिझम’ची फाइल बंद; वर्धा जिल्ह्यात तीन निसर्गसंपन्न स्थळांचा ‘डीपीआर’ निधीअभावी रखडला – dpr of 3 nature rich sites in wardha district stalled due to lack of funds pri


एकनाथ चौधरी, वर्धा : जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील ढगा, आर्वी तालुक्यातील सारंगपुरी तलाव आणि सेलू तालुक्यातील बोर अशा तीन स्थळांवर ‘इको टुरिझम’ विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. ‘डीपीआर’देखील तयार करण्यात आले. निधीच्या अडचणीतून या प्रस्तावाची फाइल बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बोर प्रकल्पाला २७ नोव्हेंबर १९७० रोजी वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. ऑगस्ट २०१४मध्ये व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. नागपूर आणि वर्धा अशा दोन जिल्ह्यांच्या सीमेत असलेल्या या अभयारण्यात १६० प्रजातींच्या विविध पक्ष्यांसह वाघ, अस्वल, हरीण, सांबर, रानकुत्रे आणि नीलगाय पर्यटकांना खुणावतात. याच अभयारण्याला लागून असलेल्या माळेगाव ठेका, बोरी, आमगाव, ढगा, बांगडापूर, रायपूर, हिंगणी, सालई कला, तामसवाडा ही गावे आपली संस्कृती राखून आहेत. बोर, रिधोरा, नानबर्डी, मदन यासारखी लहान-मोठी धरणेदेखील आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत पूरक असा हा प्रदेश विकसित होण्याची गरज आहे. सातपुडा पर्वतरांगांतील धाम नदीच्या उपनदीजवळ ढगा हे जंगलक्षेत्र आहे. ब्रिटीश शासनकाळात आर्वीत १९१७मध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली होती. या जलाशयातून आर्वी शहराला पाणीपुरवठा केला जातो. या तलावावर विविध जातींचे पक्षी येत असल्याने पक्षीप्रेमींची गर्दी असते. या तलावाला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार, खेळणे, बांबू मचाण, बाग, बोटिंग, बालोद्यान उभारण्यात आले आहे. ‘इको टुरिझम’च्या माध्यमातून या स्थळांवर पर्यटनदृष्ट्या विकास शक्य आहे.
Maharashtra Timesलग्नाच्या १० वर्षांनी लेक जन्मला, पण काळानेच हिरावला, ट्रकच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू, कल्याण हादरलं
पर्यटनविकासाला वाव
वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्रप्रकल्प, सेवाग्राम, पवनार, कोटेश्वर, ढगा, आजनसरा आणि केळझर यासारखी नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. हा भाग एकमेकांशी जोडला गेलेला आहे. अवघ्या काही मिनिटांत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे सहज शक्य आहे. या भागातही ‘इको-टुरिझम’ला वाव आहे. याशिवाय सेलू, आर्वी आणि कारंजा तालुक्यातील ग्रामीण जीवन अनेकांना खुणावते. वर्ध्याचे सारंगपुरी, ढगा, महाकाळी, रिधोरा, बोर, केळझर, हिंगणी, हेटी कुंडी ही स्थळे एकमेकांशी जोडून पर्यटनविकास शक्य आहे.
Maharashtra Times‘राष्ट्रवादी-शप’ला गळती? शरद पवारांच्या पक्षातील खासदार, आमदार फुटण्याच्या चर्चेने खळबळ
योजनेचे परिणाम
युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लाभदायी.
पर्यावरण रक्षणासह पर्यटन वाढणार.
स्थानिकांच्या विकासात भर पडेल.
रूढी, प्रथा, परंपरांचे पर्यटकांना दर्शन होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत