Headlines

इंग्लंडचा भारतावर 4 विकेटने विजय! ‘मला त्यांच्याकडून आशा होती’; कॅप्टन गिलने सांगितलं मॅच नेमकी कुठे गमावली?


Shubman Gill News : पहिल्या वनडे सामन्यामध्ये केलेली चुक सुधारत इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचं नेमकं कुठं चुकलं याबाबत कॅप्टन शुभमन गिल सांगताना त्याला कोणत्या खेळाडूंकडून आशा होती आणि कुठे गडबड झाली हे स्पष्ट केलं आहे.

IND vs ENG 2nd ODI
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा ६ विकेटने पराभव केला आहे. हॅरी ब्रूक याने टॉस जिंकत आज पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाला इंग्लंडच्या गोलंदाजांनी २३३ धावांवर ऑल आऊट केले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जोस बटलर याने पुन्हा एकदा एकट्याच्या दमावर विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या एका बाजूने विकेट जात असताना दुसरी बाजू रूट लढवत होता. सर्वांसोबत लहान-लहान भागीदारी करत अखेर विजय मिळवून दिला. पण रूटचे शतक फक्त १ धावेने हुकले. जो रूट ९९ धावांवर नाबाद राहिला. तर शेवटला तीन धावांची गरज असताना एटकिन्सन याने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन सामन्यांच्या मालिकेतील इंग्लंडने हा सामना जिंकत १-१ ने बरोबरी केली आहे. या पराभवानंतर शुभमन गिल काय म्हणाला जाणून घ्या.

भारताने सामना कुठे गमावला?

25 ओव्हरनंतर चांगल्या स्थितीत असूनही जास्त विकेट्स गेल्यामुळे सामना हातून निसटला. आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या पण ते अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत, त्यामुळे पुढच्या वेळी छोट्या-छोट्या भागीदारी करण्याचा प्रयत्न करू. संघासाठी महत्त्वाचा असलेला सुंदर फलंदाजी करताना जखमी झाला, त्यामुळे आम्हाला मुख्य गोलंदाजांनाच गोलंदाजी करावी लागली, ज्यामुळे फारसा फरक पडला नाही. सामन्याच्या मध्यात आमची गती थोडी कमी झाली आणि जो रूट अशा धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असल्याचं शुभमन गिल म्हणाला. गिलच्या म्हणण्यानुसार विकेट आणि श्रेयस यांनी डाव सावरला होता परंतु त्यानंतर भारताच्या ५५ धावांत ७ विकेट गेल्या त्यामुळे भारताला २५० धावसंख्याही उभारता आली नाही.
Maharashtra TimesIND vs ENG 2nd ODI : भारत वि. इंग्लंड दुसरा वनडे, के.एल. राहुल प्लेइंग 11 मधून बाहेर; कॅप्टन शुभमन गिलची इच्छा नसताना घ्यावा लागला निर्णय

दुसऱ्या वनडेचा सविस्तर आढावा

भारताकडून आज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात केली होती. रोहितने सावध पवित्रा घेतल्याचं दिसत होतं. त्यामुळे शुभमन गिल याने आक्रमक पवित्रा घेत रनरेट वाढवण्याचे काम केले. परंतु चौकार मारण्याच्या नादात गिल ३१ धावांवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा जम बसला असे वाटत होते पण विल जॅक्सने रोहितला (२६ धावा) आऊट करत ही जोडी फोडली. रोहित आणि कोहलीमध्ये ६० धावांची भागीदारी झाली होती. ईशान किशनही लगोलग १ धाव काढून परतला, श्रेयस अय्यर आणि विराट यांनी आपल्या हातात डावाची सूत्रे घेतली होती. दोघांची झालेली ६७ धावांची भागीदारी आर्चरने कोहलीला ६६ धावा करत संपवली. त्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.अक्षर पटेल १ धाव, वॉशिंग्टन सुंदर २ धावा आणि शिवम दुबे ० धावांवर माघारी परतला. १७८-४ असलेला भारतीय संघ २३३ धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि एटकिन्सन यांनी सर्वाधिक ३-३ विकेट नावावर केल्या होत्या.
Maharashtra TimesINDvsENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन बदलणार? सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरू होणार?
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच बॉलवर बुमराहने झटका दिला होता. डकेटला शून्यावर माघारी पाठवले. चौथ्या ओव्हरमध्ये बेथल ४ धावांवर आऊट केले. इंग्लंडची अवस्था ८-२ अशी झाली होती. मात्र जो रूट याने सर्वांसोबत केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडने डाव सावरला. भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी धक्के देत जोड्या फोडल्या, यामध्ये हॅरी ब्रूक १६ धावा, सॅम करन २६ धावा, जोस बटवर १७ धावा काढून परतले. मात्र त्यानंतर विल जॅक्ससोबत रूटने ८६ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करत सामना फिरवला.

दरम्यान, या मालिकेमध्ये भारत आणि इंग्लंडने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना जो जिंकेल तो मालिका खिशात घालणार आहे. तिसरा सामना रविवारी १९ जुलैला लॉर्ड्स मैदानावर पार पडणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा