![]()
तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षितअंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीहीपूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादादुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कारमहामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेचरिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठीअसलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळदिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्यावाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशःदिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापरकेल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचेआश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातीलदैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचाकेंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होताका? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्नमहत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधतमहामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्गव्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसादव्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवरन्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलदआपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोतका? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाहीतर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवानामिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हासरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवूशकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्रप्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रियाकौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापनकरण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनलीआहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूनेओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळशिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हेनियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवापार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षितवाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमताआणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंडस्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येकनिर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याचीजाणीव असणे महत्त्वाचे आहे. भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजीवाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेककेल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेचजबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्याअर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळआली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षमहवी. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
Source link
आदर्श जोशी यांचा कॉलम:रस्त्यांबरोबरच ‘चालकां’चेदेखील भले होणे तितकेच गरजेचे
