रक्षाबंधनाच्या तोंडावर तीन बहिणींच्या एकुलत्या एका भावानं जीवन प्रवास संपवला. आदर्शच्या अकाली एक्झिटनं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. आयुष्य संपवण्याआधी त्यानं कुटुंबासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लखनऊ: रक्षाबंधनाच्या तोंडावर तीन बहिणींच्या एकुलत्या एका भावानं जगाचा निरोप घेतला आहे. घरात आनंदाचं वातावरण असताना काळानं अचानक घाला घातला. तीन बहिणी रक्षाबंधनाची आतुरतेनं वाट पाहात होत्या. पण आता त्यांच्यावर भावाच्या फोटोला राखी बांधण्याची वेळ आली आहे. आदर्शच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आदर्श एक दिवसापूर्वीच घरात झालेल्या रुद्राभिषेकाच्या कार्यक्रमानंतर लखनऊला परतला होता. यानंतर त्यानं अचानक टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. त्याच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. आदर्श मृत्यूसमयी १८ वर्षांचा होता. मूळचा संत कबीर नगर जिल्ह्यातील महेरवाचा रहिवासी असलेला आदर्श मिश्रा लखनऊमधील एका खासगी महाविद्यालयात बीटेकच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गावात रुद्राभिषेकाचा कार्यक्रम होता. त्यात सहभागी होण्यासाठी आदर्श घरी आला होता. त्यानं कुटुंबासोबत वेळ घालवला. मग रविवारी तो लखनऊसाठी रवाना झाला. वडील प्रमोद मिश्रा यांनी स्वत: त्याला बसमध्ये बसवून दिलं. ही आदर्श सोबतची अखेरची भेट असेल, याची पुसटशीही कल्पना त्यावेळी कुटुंबाला नव्हती.
मंगळवारी सकाळी आदर्श फोनवरून आई, वडिलांशी बोलला. पण त्यानंतर पुढील काही तासांनी त्याची तब्येत बिघडल्याची माहिती मित्रांकडून कुटुंबाला समजली. आदर्शला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही बातमी समजताच कुटुंब लखनऊला रवाना झालं. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आदर्शची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण बुधवारी उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांना आदर्शच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी आई, वडिलांची माफी मागितली आहे. ‘मम्मी-पप्पा सॉरी. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. सगळ्यांनी मला माफ करा,’ असा मजकूर चिठ्ठीत आहे. आदर्शनं टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आदर्शच्या मृत्यूचं गूढ कायम आहे.
आदर्श तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण त्याच्या कुटुंबासाठी कायमच खास असायचा. यावेळीही आदर्शच्या बहिणी त्याची वाट पाहात होत्या. पण रक्षाबंधनाआधी आदर्शनं जीवन प्रवास थांबवला. ज्या घरात रक्षाबंधनाची लगबग सुरू होती, तिथे आता आक्रोश सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कुटुंबाला भेटून गेलेल्या आदर्शनं मरण का कवटाळलं, असा प्रश्न त्याच्या बहिणींना पडला आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा