Vidarbha School Reopening: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर अंतर पायी पार करून शाळेत जावे लागते. अशा परिस्थितीत कडक उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा मांडण्यात आला. तसेच यापूर्वीचे आदेशही मांडले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारला, २००७मधील न्यायालयीन निर्णय अस्तित्वात असताना विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा तोंडी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने मंगळवार, ९ जून रोजी संध्याकाळी नवे परिपत्रक काढत ‘विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू व्हाव्यात,’ असे या परिपत्रक काढले. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारतर्फे बाजू मांडताना ॲड. दीपक ठाकरे यांनी हे नवे परिपत्रक सादर केले. यावर बुधवारी निकाल देताना न्यायालयाने शिक्षण संचालनालयाचे २८ मार्च रोजीचे परिपत्रक तसेच ९ जूनचे अशी दोन्ही परिपत्रके रद्द केली.
Congress News: महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा
याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर, जून महिन्यात विदर्भातील तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आणले.
Nagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
– तर यानंतर अवमान कारवाई करू
न्यायालयाने विदर्भातील तापमान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि यापूर्वीचे न्यायालयीन आदेश लक्षात घेत २३ एप्रिल २०२३ रोजीचा शासननिर्णय अंतिम ठरविला. त्यानुसार शाळा ३० जून व त्या दिवशी सुटी असल्यास त्यानंतरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशीच सुरू कराव्यात, असे स्पष्ट केले; तसेच आजवरच्या न्यायालयांच्या आदेशांकडे शिक्षण संचालकांकडून दुर्लक्ष झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासननिर्णय अस्तित्वात असताना शिक्षण संचालकांनी स्वतंत्र पत्र काढणे योग्य नसल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

