Headlines

Veer Savarkar,Devendra Fadnavis: काँग्रेसच्या एकातरी स्वातंत्र्यसैनिकाने सावरकरांसारखे अत्याचार सहन केलेत का? फडणवीसांचा सवाल – devendra fadnavis slams congress bharat jodo yatra leader rahul gandhi over congress criticises savarkar


Veer Savarkar | स्वातंत्र्यीवर सावकर हे अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती. कारागृहातील शेकडो लोक कदाचित वेडे झाले असते. अंदमानच्या काळकोठडीत तोपर्यंत अनेक कैदी ठार वेडे झाले होते. पण या कारागृहातील कैद्यांना बंड करण्याचा धीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. राहुल गांधी यांना कोणीतरी काहीतरी लिहून देते आणि ते सावरकरांविषयी काहीही बोलतात. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावातील ‘स’ तरी माहिती आहे का?

हायलाइट्स:

  • राहुल गांधी यांच्यासारखे काँग्रेसचे नेते रोज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटं बोलतात
  • अत्याचार सहन करूनही सावरकरांनी नेहमी स्वातंत्र्यलक्ष्मीचं गीत गायले
Rahul Gandhi Vs Devendra Fadnavis
राहुल गांधी Vs देवेंद्र फडणवीस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील एकमेव असे नेते आहेत की, त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसच्यावतीने त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचा प्रयत्न होतो. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यासारखे काँग्रेसचे नेते रोज स्वातंत्र्यवीर सावरकर ( Veer Savarkar ) यांच्याविषयी खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, निर्लज्जपणे काहीतरी सांगतात. त्यांना महाराष्ट्रातील जनता नक्की उत्तर देईल, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते.
Maharashtra TimesNitin Gadkari: या देशात सावरकर मोठे नाहीत, तर कुणीच मोठे ठरु शकत नाही: गडकरी
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेत्यांविषयी मला प्रचंड आदर आहे. पण माझा सवाल आहे की, अंदमानच्या कोठडीत ११ वर्षे वीर सावरकर यांच्याप्रमाणे अनन्वित अत्याचार सहन करणारा, एकतरी नेता मला दाखवा. अशाप्रकारचे अत्याचार सहन करूनही सावरकरांनी नेहमी स्वातंत्र्यलक्ष्मीचं गीत गायले, असे फडणवीस यांनी म्हटले.
Maharashtra Timesराज्य नाट्य स्पर्धा : पहिल्याच दिवशी सावरकरप्रेमींचा गोंधळ, नथुराम समर्थनाच्या घोषणा, ते नाटक पाडले बंद

सावरकर अंदमानच्या तुरुंगात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केल्या असत्या: फडणवीस

स्वातंत्र्यीवर सावकर हे अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती. कारागृहातील शेकडो लोक कदाचित वेडे झाले असते. अंदमानच्या काळकोठडीत तोपर्यंत अनेक कैदी ठार वेडे झाले होते. पण या कारागृहातील कैद्यांना बंड करण्याचा धीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला. राहुल गांधी यांना कोणीतरी काहीतरी लिहून देते आणि ते सावरकरांविषयी काहीही बोलतात. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावातील ‘स’ तरी माहिती आहे का? राहुल गांधी फक्त लिहलेलं वाचतात. सावरकर फक्त तीन ते चार वर्षे अंदमानच्या कारागृहात होते, असं बोलतात. अशा लोकांना आपण उत्तर दिलं पाहिजे आणि आपण ते देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. स्वातंत्र्यीवर सावरकर यांना एक माहिती होतं की, हिंदू समाज जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था संपवून एक होत नाही तोपर्यंत हा देश दुर्बल राहील. हिंदू समाज एकत्र होता तोपर्यंत भारतीय लोकांमध्ये विजीगीषू वृत्ती जिवंत होती, त्यांनी अनेक आक्रमणं परतवून लावली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रोहित धामणस्कर

लेखकाबद्दलरोहित धामणस्कररोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.आणखी वाचा