Headlines

Vasai-Virar News: वसई, विरारमधील पूरस्थितीवरील चर्चाही पाण्यात; पाणीपट्टीच्या गदारोळात पालिकेची महासभा संपली – vasai and virar flood situation discussion stalled municipality general body meeting concluded amidst uproar over water bill


Vasai-Virar News: प्रशासनाने लागू केलेली पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेत विरोधी पक्षातील भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप सदस्यांनी सभात्याग केला.

vasai virar news
वसई-विरार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, वसई: जुलैच्या सुरुवातीला वसई-विरारमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची कारणमीमांसा आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या महासभेत हा विषय पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र, वाढीव पाणीपट्टीच्या मुद्द्यावर झालेल्या गदारोळामुळे महासभा तहकूब करण्यात आली आणि पूरस्थितीसारख्या महत्त्वाच्या विषयावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. वाहतूक विस्कळीत झाली होती, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीची कारणे, जबाबदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महासभेत चर्चा होणे अपेक्षित होते.

Maharashtra TimesGirish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला
सामाजिक कार्यकर्त्यांनी अपूर्ण नालेसफाई, नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद होणे आणि अनधिकृत बांधकामांमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच पूर टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत करण्यात आल्या नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, महासभेच्या सुरुवातीलाच वाढीव पाणीपट्टीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला.

विरोधक सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पूरस्थितीवरील चर्चेला सुरुवात होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रशासनाने सभा संपल्याचे जाहीर केल्याने हा विषय चर्चेविनाच राहिला. परिणामी, पूरस्थितीची कारणे, जबाबदारी आणि भविष्यातील उपाययोजनांवर कोणताही निर्णय किंवा चर्चा होऊ शकली नाही.

Maharashtra TimesAccident News: आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ
नागरिकांमध्ये नाराजी
पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असताना महासभेत त्यावर चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा