Headlines

Traffic congestion in chakan forces 20 companies to relocate 2000 workers futures at stake; वाहतूक कोंडीमुळे चाकणमधील २० कंपन्या दुसरीकडे जाणार; सरकारवर गंभीर आरोप


चिंतामणी पत्की, पुणे: पुणे शहरासह आसपासच्या भागात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीला कंटाळून चाकणमधील वीस कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील वीस कंपन्या खंडाळा औद्योगिक वसाहतीमध्ये स्थलांतरित होणार असून या वीस कंपन्यांमध्ये तब्बल दोन हजार कामगार आहेत. कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत कर्मचाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती सदर कंपन्यांच्या मालकांनी दिली आहे.

” वाहतूक कोंडी च्या समस्येबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना तीन वेळा मेल पाठवला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आमची अवस्था आयसीयूमधील रुग्णासारखी आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी आणि वीज नाही , चालायला रस्ते नाहीत. त्यामुळे आम्ही खंडाळा एमआयडीसी येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी भूमिका पत्रकार परिषदेतून चाकण येथील वीस कंपन्यांच्या मालक आणि संचालकांनी मांडली आहे. यामध्ये कुणाल कड, दिलीप बटवाल, शंतनु कुलकर्णी, जयदेव अक्कलकोटे आणि धनंजय शेडबाळे यांचा समावेश आहे.

चाकणमधील स्थितीबद्दल बोलताना कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, “चाकण एमआयडीसीमध्ये ७५० लघु कंपन्या आहेत. त्याद्वारे ३२ हजार कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले जाते. मात्र अपुऱ्या सोयीसुविधांमुळे नुकसान होत असून २०० कंपन्या या त्रासातून जात आहेत. पुणे – नाशिक महामार्ग भोसरी ते चाकण (आंबेठाण चौक) यादरम्यान नेहमी वाहतूक कोंडी असते. सकाळी आणि संध्याकाळी हे अंतर पार करण्यासाठी ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.”

दरम्यान, “कंपन्या बाहेर जात नाहीत, हा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांचा दावा खोटा आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत. सरकारकडून केवळ बैठका आणि आश्वासन दिले जाते. मात्र सरकारी यंत्रणांचा प्रतिसाद निराशाजनक आहे,” असा आरोपही पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे.

दरम्यान, चाकण येथील वाहतूक समस्येबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाकडून बैठक घेण्यात येणार आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे. “महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पुणे जिल्ह्यात चाकण व तळेगांव येथे अनुक्रमे ३२६३ हेक्टर व ६७५ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित केलेले आहे. सदर औद्योगिक क्षेत्रामध्ये महामंडळातर्फे सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत व तेथे नामांकित उद्योग स्थापित आहेत. सदर औद्योगिक क्षेत्रांमध्ये व त्यालगत वाहतुकीची कोंडी भेडसावत आहे. या औद्योगिक क्षेत्रात व त्यालगत रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती विविध शासकीय यंत्रणांमार्फत केली जाते. वाहतूक कोंडीची समस्या नजिकच्या काळातील पावसाळ्यामुळे तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे निर्माण झालेले खड्डे यामुळे वाढली आहेत. या अनुषंगाने बुधवारी दुपारी १ वाजता समस्यांबाबत उपाययोजनांचा आढावा व नियोजन करण्यासाठी संबंधित शासकीय विभागांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे,” असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत