Headlines

Temple Donations: भारतातील मंदिरांच्या खजिन्यात हिरे, सोन्याचे दागिने; कोट्यवधी कमवणाऱ्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे चालते? सरकारच काम काय? – tirupati balaji ayodhya how biggest temples in indias safeguard devotees offerings who handles billions of donations at temples


Ayodhya-Badrinath Temple Donation Theft: अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये अफरातफरीचे आरोप होत असतानाच आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने बद्रीनाथ धाममधील अर्पण केलेल्या देणग्यांबाबत अशाच आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Richest Indian Temples Management Rules
भारतातील श्रीमंत मंदिरांच्या खजिन्यात हिरे, सोन्याचे दागिने; कोट्यवधी कमवणाऱ्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे चालते?
Temple Donation Theft: आपल्या देशात श्रद्धा आणि अध्यात्माचा इतिहास जितका प्राचीन आहे, तितकाच मंदिरांच्या अफाट संपत्तीशी घनिष्ठ संबंध राहिले आहे. दररोज लाखो भक्त भक्तीभावाने धार्मिक स्थळांना अब्जावधी रुपये, सोने आणि चांदीचे दान करतात, पण अयोध्येतील राम मंदिरात अर्पण केलेल्या वस्तूंच्या चोरीच्या अलीकडील प्रकरणामुळे देशभरात नव्या चर्चेला उधाण आले आहे. या घटनेनंतर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांचे व्यवस्थापन कसे केले जाते आणि भक्तांनी दान केलेल्या पैशांची देखभाल कोण करतं, हाच प्रश्न सर्वांच्या ओठांवर आहे.

भारतातील मंदिरे किती श्रीमंत

<strong>भारतातील मंदिरे किती श्रीमंत</strong>

भारतात तब्बल 8 ते 10 लाख मंदिरे आहेत, यापैकी अंदाजे चार लाख आणि त्यांचे विश्वस्त विविध राज्य सरकारांनी घालून दिलेल्या विशिष्ट धार्मिक कायदा आणि भारतीय विश्वस्त कायदा, 1882 नुसार थेट नियंत्रित केले जातात. या सर्व सरकारी आणि निम-सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांची अंदाजित संपत्ती 9 लाख कोटी रुपयांपेक्षा म्हणजे अंदाजे 1.2 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असून ही रक्कम मोठ्या राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे.

​कोणत्या राज्यात सर्वाधिक मंदिरे

<strong>​कोणत्या राज्यात सर्वाधिक मंदिरे</strong>

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात सर्वाधिक मंदिरे आहेत. तामिळनाडूमध्ये अंदाजे 79,154 नोंदणीकृत मंदिरे असून त्याचे व्यवस्थापन राज्य सरकारद्वारे केले जाते. त्यानंतर महाराष्ट्रात 77,283 नोंदणीकृत मंदिरे, मग पश्चिम बंगाल 53,६658 मंदिरांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बनारस आणि काशीमध्ये मंदिरांचे व्यवस्थापन कोण करते?

<strong>बनारस आणि काशीमध्ये मंदिरांचे व्यवस्थापन कोण करते?</strong>

उत्तर प्रदेशात 37,500 हून अधिक नोंदणीकृत मंदिरे आणि धार्मिक विश्वस्त संस्था आहेत. या राज्यातील तीन सर्वात महत्त्वाची धार्मिक स्थळे – काशी, अयोध्या आणि मथुरा – पूर्णपणे किंवा अंशतः सरकारच्या अखत्यारीत आहेत. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिर पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून व्यवस्थापनावर वाराणसीच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाद्वारे देखरेख केली जाते. तसेच मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

तिरुमला तिरुपती सर्वात श्रीमंत देवस्थान

<strong>तिरुमला तिरुपती सर्वात श्रीमंत देवस्थान</strong>

देशभरातील मंदिरांपैकी तिरुमला तिरुपती देवस्थानमला सर्वाधिक देणग्या किंवा दान दिले जाते. या मंदिराला दरवर्षी 1,880 कोटींची देणगी मिळते, तसेच ऑनलाईन तिकीट विक्री आणि प्रसादातून अतिरिक्त 1000 कोटींचा महसूल मिळतो. आंध्र प्रदेश सरकारच्या नेतृत्वातील मजबूत ट्रस्ट या मंदिर संपत्तीचे व्यवस्थापन करते. याशिवाय फसवणूकीची शक्यता कमी करण्याच्या उद्देशाने तिरुपती मंदिराने एक मजबूत UPI-आधारित डिजिटल देणगी प्रणाली लागू केली असून सोने-चांदी दान करणाऱ्यांना थेट प्रशासकीय कार्यालयात जाऊन पावती घेणे अनिवार्य आहे.

9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती

<strong>9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती</strong>

देशातील प्रमुख मंदिरांपैकी तिरुपती मंदिराला अंदाजे 1880 कोटी, माता वैष्णो देवी मंदिराला 250 कोटी, अयोध्या राम मंदिराला 150 कोटी, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला 100 कोटी, काशी विश्वनाथ मंदिराला 80 कोटी आणि जगन्नाथ पुरी मंदिराला वार्षिक 18 कोटींची देणगी मिळते. अशाप्रकारे, देशातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरांची एकूण संपत्ती 9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा ग्लोबल वेल्थ इंडेक्सच्या आकडेवारीवरून उघड होते.

मंदिरांमध्ये कुठे ठेवली जाते देणगी, सोने-चांदी

<strong>मंदिरांमध्ये कुठे ठेवली जाते देणगी, सोने-चांदी</strong>

गेल्या दोन वर्षात सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे या काळात मंदिरांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिरुपती देवस्थानमकडे 3 लाख कोटींच्या संपत्तीचा अंदाज असून मंदिर प्रशासनाने वेगवेगळ्या बँकांमध्ये 10 टनांहून अधिक सोने जमा केले आहे. त्यानंतर केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर आपल्या गुप्त ‘तिजोऱ्यां’साठी जगभर प्रसिद्ध असून येथे प्राचीन सोन्याची नाणी, हिरे, रत्ने आणि मौल्यवान मूर्तींनी मंदिराची तिजोऱ्या भरलेल्या आहेत. तसेच मंदिर ट्रस्टकडे शेकडो एकर महागडी जमीनही आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा