परंतु , सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय ‘कार अपघात’ आणि ‘विमा क्लेम’ संबंधित आहे. बऱ्याचदा बहुतेक गाडी मालकांना गैरसमज असतो की ‘वाहनात मृत्यू झाला तर Motor Accident Compensation Claim मिळतो.’ वाहन अपघातात मृत्यू झाला तर विमा क्लेम मिळतो हे खरं आहे पण त्यासाठी मृत्यू खरोखरच वाहनामुळेच झाला आहे का? हे सिद्ध करणेही तितकेच गरजेचे आहे. कारण त्याशिवाय विमा क्लेम करता येत नाही.
हल्लीच दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात वाहन आणि मृत्यू या विषयासंबंधित एक खटला सुरु होता. आनंद नावाच्या व्यक्ती संबंधित ही केस असून त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की तो मृत्यूच्या तीन दिवसांगोदर एका गाडीत बसून गेला होता. तीन दिवसांनंतर त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना मिळाली. गाडीत प्रवासादरम्यान हत्या झाली म्हणून त्याचे कुटुंबीय विमा क्लेमची मागणी करू लागले पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळूनलावली आहे.
Gold Silver Price August 2026: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोल्ड शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याचे दर भडकले, चांदीचेही भाव वाढले
काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?
सुप्रीम कोर्टाने आनंद यांच्या कुटुंबीयांची मागणी फेटाळलीआहे. तसेच न्यायाधीशांकडून सांगण्यात आले आहे की, “जर मृत्यूचा संबंध थेट गाडीशी असेल तरच संबंधित व्यक्ती विमा क्लेमला पात्र ठरतो.” गाडी किंवा वाहनामध्ये झालेला प्रत्येक मृत्यू हा विमा क्लेमला पात्रच ठरेल असे नाही. कार लुटण्याच्या प्रकारामुळे झालेला मृत्यूही विमा क्लेमला पात्र ठरतो. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की एक्सीडेंटल क्लेमसारखा मुद्द्यात पोलीस तपास करण्याची काहीच गरज नाही. क्लेमची मागणी करणाऱ्या कुटुंबियांना मृत्यू हा वाहनामुळेच झाला आहे किंवा संबंधिताच्या मृत्यूचा थेट संबंध गाडीशी आहे हे सिद्ध करणे भाग आहे.

