साखर खरेदी करण्यावर मर्यादा म्हणजे नेमकं काय?
ग्राहकांना आता त्यांना हवी तितकी साखर खरेदी करता येणार नाही. देशात यंदा साखरेचे उत्पादन फार कमी झाल्यामुळे साखर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अशात भारत सरकारने साखर वितरक तसेच साखरेचा साठा भरून ठेवणाऱ्या विविध कंपन्यांवर काही मर्यादा लावल्या आहेत.याचेच परिणाम आता देशातील ग्राहकांना भोगावे लागणार आहे. काही रिटेल स्टोअर्स तसेच विविध क्विक कॉमर्स कंपन्यांनी साखर विक्रीवर काही बंधने घातली आहेत.
आता ग्राहकांना डी-मार्ट तसेच रिलायन्स रिटेलसारख्या रिटेल शॉपमध्ये खरेदी करताना एकावेळी फक्त 3 किलोपर्यंत साखर खरेदी करता येणार आहे. त्यापेक्षा जास्त साखर खरेदी करण्याची मुभा सध्या बंद करण्यात आली आहे.
रिटेल शॉपप्रमाणे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही साखर खरेदीविषयी बंधने घालण्यात आली आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर साखरेचे फक्त 2 ते 3 पॅक खरेदी करता येणार आहे. साखरेचे काही प्रसिद्ध ब्रॅंडस या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.तर काही ठिकाणी 5 किलोचा फक्त एकच पॅक उपलब्ध आहे. एकंदरीत, साखरेच्या पुरवठ्यात कमतरतेचे परिणाम क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.
साखर खरेदीवर मर्यादा का?
बाजारात साखर कमी असल्याने साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी, भारत सरकारने देशातील साखर वितरक कंपन्यांच्या साखर साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढत आहे अशात देशात साखरेचा क्लोजिंग स्टॉक कमी आहे त्यामुळे साखरेच्या विक्रीवर दबाव तयार झाला आहे. या काळात जर एकाच ग्राहकाने मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी केली तर साठवलेला साखरेचा स्टॉक पटकन संपण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे काही रिटेल शॉप तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सने ग्राहकांच्या साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत.
Joint Ownership Rules: सह-कर्जदाराचा मृत्यू झाला, तर EMI ची जबाबदारी कोणाची? अख्खा कर्ज माफ होतो का? कायदा, नियम समजून घ्यासाखर पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना
देशात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी 10 लाख टन कच्च्या साखरेची आयात ड्यूटी फ्री करण्यात आली आहे. तसेच डीलर्स किंवा बल्क Consumers मंडळींना फक्त 15 दिवसांपुरतीच्या साखरेची साठवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

