Headlines

Success Story of Mohan Singh Oberoi; दैनंदिन 40 रुपये कमवणाराही टाटांना मात देऊ शकतो, फक्त जिद्द हवी! ओबेरॉय हॉटेल्सची कहाणी एकदा वाचाच


Success Story on Indian Hotelier: सरकारी लिपिक परीक्षेत नापास झालेल्या मोहन सिंग ओबेरॉय यांनी कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने ओबेरॉय ग्रुपची स्थापना केली. अवघ्या 40 रुपये पगारावर नोकरी करणाऱ्या ओबेरॉय यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि भारतातील आलिशान आतिथ्य क्षेत्रात एक विशाल साम्राज्य उभारले, ज्याचे व्यवस्थापन आता त्यांची चौथी पिढी करत आहे.

राजकारणापासून पद्मभूषणपर्यंत
व्यावसायिक भरभराट करण्यासोबतच त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात राज्यसभा व लोकसभा या दोन्ही संभागृहांमध्ये खासदार म्हणून काम केले. 1965 मध्ये त्यांनी ओबेरॉय इंटरकॉन्टिनेंटल सुरू करून देशातील पहिले आधुनिक पंच-तारांकित हॉटेल सुरू केले. 3 मे 2002 रोजी वयाच्या 103 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन सिंग ओबेरॉय यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पृथ्वीराज सिंग (बिकी) ओबेरॉय यांनी वारसा सांभाळला तर, आता त्यांची चौथी पिढी (विक्रम आणि अर्जुन ओबेरॉय) हा मल्टीनॅशनल चालवत आहे.
Success Story: भारतातील सर्वात मोठा हॉटेल ब्रँड कोणता? हा प्रश्न तुम्हाला विचारला तर प्रत्येकाकडून एकच उत्तर येईल -टाटा ग्रुपचे ताज पॅलेस. पण तुम्हाला माहित्येय का की एकेकाळी 40 रुपये पगारावर हॉटेल रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मोहनसिंग ओबेरॉय यांनी टाटांना टक्कर देणारे भारतातील दुसरे सर्वात मोठे हॉटेल चेन सुरू केले आणि आज भारतातील हॉटेल उद्योगाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.

देशातील दुसरा सर्वात मोठा हॉटेल ब्रँड

<strong>देशातील दुसरा सर्वात मोठा हॉटेल ब्रँड</strong>

मोहन सिंग ओबेरॉय यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सर्वसामान्यांमध्ये कदाचित हे नाव इतकं प्रचलित नसेल पण, उद्योग विश्वात त्यांची ख्याती देशातच नव्हे तर विदेशातही पसरली आहे. भारतातील हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले जाणारे मोहन सिंग ओबेरॉय यांनी टाटांच्या नंतर भारतातील दुसऱ्या मोठ्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सची स्थापना केली. ओबेरॉय ग्रुपची भारत, इंडोनेशिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि सौदी अरेबियामध्ये 31 हॉटेल्स आहेत.

हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले

<strong>हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले</strong>

ओबेरॉय आणि ट्रायडेंट सारखी हॉटेल्स स्थापन करून मोहन सिंग ओबेरॉय यांनी भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगाला जागतिक ओळख मिळवून दिली. EIH लिमिटेड आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेड या दोन सूचीबद्ध ओबेरॉय ग्रुपच्या कंपन्या असून त्यांचे एकत्रित बाजार भांडवल अंदाजे 25,000 कोटी रुपये आहे. एका सामान्य लिपिकापासून ते भारतीय हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा आधारस्तंभ बनण्यापर्यंत मोहन सिंग ओबेरॉय यांचा प्रवास खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

लिपिका परीक्षेत नापास

<strong>लिपिका परीक्षेत नापास</strong>

कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठं अपयश हेच यशाची महत्त्वाची पायरी ठरते. ओबेरॉय ग्रुपचे संस्थापक मोहन सिंग ओबेरॉय यांचा प्रवास याचं उत्तम उदाहरण आहे. अविभाजित पंजाबमधील (आताचे पाकिस्तान) एका लहानशा गावात जन्मलेल्या मोहन सिंग यांच्या डोक्यावरून वयाच्या फक्त सहाव्या महिन्यातच वडिलांचं छत्र हरपलं. 1922 मध्ये प्लेगच्या साथीनंतर सरकारी लिपिकाची परीक्षा देण्यासाठी फक्त 25 रुपये घेऊन शिमला येथे आले. मात्र, नशिबाने वेगळाच डाव साधला आणि परीक्षेत नापास झाले. (प्रातिनिधिक फोटो)

नवनवीन काम शिकण्याचा उत्साह

<strong>नवनवीन काम शिकण्याचा उत्साह</strong>

मोहन सिंग यांनी रावळपिंडी येथे आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर पदवी शिक्षणासाठी लाहोरला गेले. मग चांगल्या संधीच्या शोधात शिमला येथे स्थायिक झाले. आपल्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये नोकरी केली आणि मेहनत, उत्साह आणि तल्लख बुद्धीने हॉटेलच्या ब्रिटिश व्यवस्थापकावर खोलवर छाप पाडली. मोहन सिंग नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असायचे, आणि आपल्या डेस्क क्लर्कच्या कामाच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त कामे व नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराचे.

नेहरूंची 100 रुपये टीप अन् पहिले हॉटेल

<strong>नेहरूंची 100 रुपये टीप अन् पहिले हॉटेल</strong>

नोकरीची नितांत गरज असल्याने मोहन सिंग त्यावेळी शिमला येथील प्रसिद्ध हॉटेल सेसिलमध्ये गेले, आणि तिथे त्यांना 40 रुपये दरमहा पगारावर वॉटर हीटरसाठी कोळशाची पोती तोलण्याचे काम मिळाले. मेहनती आणि प्रामाणिकपणामुळे लवकरच त्यांना बिलिंग क्लर्कच्या पदापर्यंत बढती मिळाली. या दरम्यान, हॉटेलमध्ये थांबलेल्या पंडित मोतीलाल नेहरूंसाठी रात्रभर जागून महत्त्वाचा अहवाल टाईप केल्याबद्दल त्यांना 100 रुपयांची टीप मिळाली ज्याने त्यांना पुन्हा धैर्य दिले.

महामारी अन् युद्धाचे संधीत रूपांतर

<strong>महामारी अन् युद्धाचे संधीत रूपांतर</strong>

हॉटेल खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने आणि आपली सर्व मालमत्ता गहाण ठेवली. चार वर्षांनंतर, त्यांनी कलकत्त्यातील ग्रँड हॉटेल भाड्याने घेतले. 1938 मध्ये कॉलराच्या साथीमुळे कोलकातामधील 500 खोल्यांच्या ग्रँड हॉटेलला टाळं लागलं. परिस्थिती गंभीर होती, पण ओबेरॉय यांनी धोका पत्करून मालमत्ता अत्यंत कमी दरात भाड्याने घेतली आणि लवकरच एका फायदेशीर व्यवसायात रूपांतर केले. त्यानंतर, दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश लष्करी जवानांना निवास आणि अन्न पुरवून त्यांनी आपली प्रतिष्ठा व महत्त्व आणखी वाढवलं. या योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना ‘राय बहादूर’ या उपाधीने सन्मानित केले.

1943 मध्ये ‘असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडिया’ विकत घेऊन देशातील सर्वात मोठी हॉटेल साखळी चालवणारे पहिले भारतीय ठरले. विशेष म्हणजे, त्यांनी डी. डब्ल्यू. ग्रोव्ह यांनाच कामावर ठेवले, ज्यांनी सेसिल हॉटेलमध्ये कोळसा तोलण्याचे पहिले काम दिलेले आणि दरमहा 1500 रुपये वेतन दिले.

राजकारणापासून पद्मभूषणपर्यंत

<strong>राजकारणापासून पद्मभूषणपर्यंत</strong>

व्यावसायिक भरभराट करण्यासोबतच त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात राज्यसभा व लोकसभा या दोन्ही संभागृहांमध्ये खासदार म्हणून काम केले. 1965 मध्ये त्यांनी ओबेरॉय इंटरकॉन्टिनेंटल सुरू करून देशातील पहिले आधुनिक पंच-तारांकित हॉटेल सुरू केले. 3 मे 2002 रोजी वयाच्या 103 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन सिंग ओबेरॉय यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पृथ्वीराज सिंग (बिकी) ओबेरॉय यांनी वारसा सांभाळला तर, आता त्यांची चौथी पिढी (विक्रम आणि अर्जुन ओबेरॉय) हा मल्टीनॅशनल चालवत आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा