Sonam Wangchuk Explaination On Aamir Khan Statement : अभिनेता आमिर खानने सीजेपी विद्यार्थी आंदलनादरम्यान सोनम वांगचुक आणि 3 इडियट्स सिनेमाचा काहीही संबध नसल्याचे म्हटलेले, आता सोनम वांगचुक यांनी त्याची पोलखोल केली आहे.

जेव्हा सोनम वांगचुक जंतर-मंतरवर उपोषणाला बसले होते, तेव्हा आमिर खानने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच, ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट बनवताना आपल्याला वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ‘रँचो’ हे पात्र त्यांच्यापासून प्रेरित नव्हते, असा दावाही केला होता. आता सोनम वांगचुक यांनी आमिरच्या या दाव्यावर केवळ टीकाच केली नाही, तर त्यांची खिल्लीही उडवली आहे. वांगचुक यांनी म्हटले की, ‘गजनी’ चित्रपटातील पात्राप्रमाणेच आमिरलाही ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’चा त्रास होत असावा.
Sunil Pal On Samay Raina : घोर कलियुग!आधी अपशब्द वापरा मग सन्मानही मिळवा; महाराष्ट्र सरकराकडून समय रैनाचा सत्कार होताच सुनील पालचा संताप
सोनम वांगचुक यांनी एका पॉडकास्टवर या विषयावर चर्चा केली आणि आमिर खानबाबतचे सत्य समोर आणले. त्यांनी आमिरसोबतच्या एका जुन्या भेटीची आठवण सांगितली आणि नमूद केले की, ती एक सविस्तर चर्चा होती ज्यामध्ये काही कल्पनांवरही विचारविनिमय झाला होता.
सोनम वांगचुक यांनी आमिर खान यांची गमतीशीर शब्दांत खिल्ली उडवली. प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टवर बोलताना वांगचुक म्हणाले, “असे अनेक व्हिडिओ होते ज्यात ते ‘गजनी’ चित्रपटातील वेशभूषेत माझे भाषण पाहताना दिसत होते; कदाचित त्या वेशभूषेमुळेच त्यांना शॉर्ट टाइम मेमरी लॉस झाला असावा. अवघ्या 15 मिनिटांनंतर तो सर्व काही विसरला असेल, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अन्यथा, आमची भेट झाली होती आणि आम्ही सविस्तर चर्चाही केली होती. ते आपल्या भूमिकांमध्ये पूर्णपणे समरस होतात असे आपण ऐकले आहे; कदाचित ते ‘गजनी’च्या भूमिकेत इतके मग्न झाले असावेत की, ज्या पुरस्कार सोहळ्यात मी पुरस्कार स्वीकारत होतो, तो सोहळाच ते विसरले असावेत.”
आमिरसोबत सविस्तर चर्चा
सोनम वांगचुक यांनी पुढे नमूद केले की, त्यांनी आमिर खानसोबत अनेकदा सविस्तर चर्चा केली आणि त्यादरम्यान आपल्या कल्पना मांडल्या. त्यांनी हे स्पष्ट केले की, ‘3 इडियट्स’ हा चित्रपट आपल्या आयुष्यावर आधारित आहे किंवा ते आपले चरित्र आहे, असे ते म्हणणार नाहीत; त्याऐवजी, तो चित्रपट आपल्याकडून मिळालेल्या प्रेरणेचे प्रतिबिंब असल्याचे मानले जाऊ शकते.
वांगचुक यांचा दावा
वांगचुक यांनी दावा केला की, आमिरने त्यांच्या संभाषणातून काही मुद्दे कदाचित नकळतपणे आत्मसात केले असावेत आणि त्यातून सुचलेल्या कल्पना आपल्या टीमसोबत शेअर करून मूळ पटकथेत बदल केले असावेत. वांगचुक यांच्या मते, त्या कल्पनांचा मूळ स्रोत काय होता, याबद्दल आमीर खानने कदाचित आपल्या टीमला माहिती दिली नसावी.
सोनम वांगचुक यांच्याबद्दल आमुर खान काय म्हणाला?
‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’मधील एका चर्चेदरम्यान जेव्हा आमिर खानला सोनम वांगचुक यांच्याबद्दल विचारण्यात आले—आणि विशेषतः ‘3 इडियट्स’ मधील ‘रँचो’ या पात्रासाठी त्याने वांगचुक यांच्याकडून प्रेरणा घेतली होती का, असे विचारले असता. तेव्हा तो म्हणाला, “नाही, खरं तर ते सत्य नाही. हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला मिस्टर. सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. मला माहित आहे की मी अलीकडेच एक व्हिडिओ पाहिला ज्यात ‘चतुर’ (अभिनेता ओमी वैद्य) असे म्हणताना दिसला. त्याचा गैरसमज झाला आहे. ‘चतुर’ला कदाचित तसे वाटत असेल, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की राजू, अभिजात किंवा मला कोणालाच सोनम यांच्याबद्दल माहिती नव्हती. तरीही, मिस्टर सोनम जे काम करत आहेत ते उत्तम आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल आदर बाळगण्यासाठी ‘3 इडियट्स’मधील पात्र त्यांच्यावरच आधारित असणे आवश्यक नाही.”

