Headlines

Sheikh Hasina: याच वर्षी मायदेशी परतणार; बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा निर्धार


Sheikh Hasina: याच वर्षी मी मायदेशी परतणार, असा निर्धार बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.

sheikh hasina
शेख हसीना(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपण याच वर्षी मायदेशात परतणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, अल्पसंख्याकांवरील कोणताही हल्ला हा स्वतंत्र बांगलादेशावरील हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अवामी लीगच्या पुनरुत्थानाचाही दावा केला.

गेल्या दोन वर्षांपासून शेख हसीना मायदेशाबाहेर वास्तव्यास आहेत. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्या अवामी लीग पक्षावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या सर्व परिस्थितीनंतरही मायदेशात परतण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

Maharashtra TimesFrance Heatwave 2026: फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर! 1000हून अधिक नागरिकांनी गमावला जीव; विक्रमी उच्च तापमानाची नोंद
‘माझे मायदेशात परतणे हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा प्रश्न नसून, बांगलादेशातील लोकशाहीची पुनर्स्थापना, कायद्याचे राज्य आणि मुक्तियुद्धाच्या मूल्यांचे संरक्षण यांच्याशी निगडित आहे,’ असे त्या म्हणाल्या. आपल्याविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला. अवामी लीग ही केवळ राजकीय संघटना नसून बंगाली राष्ट्राची अस्मिता, इतिहास आणि जनतेशी जोडलेली एक शक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. ‘पक्षावरील बंदी, कार्यकर्त्यांवरील कारवाई आणि दडपशाही असूनही देशभरात अवामी लीगच्या समर्थनार्थ मिरवणुका निघत आहेत. पक्षाच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते,’ असे त्या म्हणाल्या. अवामी लीगचे पुनरागमन जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचे त्या म्हणाल्या.

Maharashtra TimesPM Modi: PM मोदींनी घेतली 194 वर्षांच्या ‘जोनाथन’ची भेट; सेशेल्स दौरा चर्चेत
बांगलादेश मुक्तियुद्धाच्या मूल्यावर आधात आला असून, अल्पसंख्याकांवर हल्ले, धार्मिक स्थळांची तोडफोड आणि अतिरेकी विचारसरणीला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढले आहेत. मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका झाल्यास अवामी लीग निश्चितपणे विजयी होईल . – शेख हसीना

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा