Rickshaw-Taxi Fare Hike: मुंबईकरांनो, १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढणार आहे. आता किती रुपये द्यावे लागणार? नवे दर तपासा…

सध्या मुंबई महानगर प्रदेशात रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आहे. नव्या दरानुसार ते २७ रुपये होणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार आणि पनवेल या महामुंबईतील भागांमध्ये ही दरवाढ लागू होणार आहे.
Rahul Gandhi Pune: राहुल गांधींचा आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम; पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्थाइंधन दरवाढ, वाहनांचे सुटे भाग, वाहन विमा, परवाना शुल्क तसेच वाहन देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे रिक्षा-टॅक्सी संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे पाठवला होता. भाडेवाढीचा अधिकार ‘एमएमआरटीए’कडे असल्याने प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करून या दरवाढीस मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, या निर्णयामुळे महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सामान्य प्रवाशांच्या रोजच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे. भाडेवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रवाशांचा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
2014 मध्येच मविआ सरकार येणार होतं? पृथ्वीराज बाबांचा गौप्यस्फोट; फडणवीस अन् 175 नेत्यांचा दाखलाशेअर भाड्याचे काय?
मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ‘एमएमआर’मधील शेअर रिक्षा-टॅक्सी भाड्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेअर भाडेवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहन —सध्याचे किमान भाडे —१ सप्टेंबरपासून
रिक्षा —२६ रुपये —२७ रुपये
काळी-पिवळी टॅक्सी —३१ रुपये —३३ रुपये

