Ashadhi Ekadashi Pune Railway Division Extra Trains : वर्षभर संसाराच्या व्यापात अडकलेला प्रत्येक वारकरी विठूमाऊलीच्या भेटीसाठी आसुसलेला असतो. लाखो विठ्ठलभक्त चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाचा गजर करण्यासाठी, स्वतःला विठ्ठलचरणी लीन करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात. भक्तांची हीच श्रद्धा आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने प्रवाशांची सोय केली आहे.

पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये नागपूर-मिरज (४ फेऱ्या), नवीन अमरावती-पंढरपूर (४), खामगाव-पंढरपूर (४) आणि लातूर-पंढरपूर (८) अशा एकूण २० फेऱ्यांचा समावेश आहे. या गाड्यांना दौंड, कुर्डूवाडी, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, पंढरपूर यांसह विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
Nagpur News : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आसुसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे अन् एसटीची आषाढीची वारी, गावातून थेट विठूरायाकडे
अनारक्षित विशेष गाड्यांमध्ये भुसावळ-पंढरपूर (४), कोल्हापूर-कुर्डूवाडी (१६) आणि पुणे-मिरज (१४) अशा एकूण ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. आरक्षित विशेष गाड्यांचे आरक्षण एक जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर; तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकीट ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे, ॲपद्वारे मिळेल.
दिंड्यांना मिळणार २० हजारांचे अनुदान
आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांमधील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान यंदाही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश सरकारने गुरुवारी (दोन जुलै) जारी केला आहे.
Nashik News : वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने
दिंड्यांना अनुदान देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून, त्याचा लाभ सुमारे एक हजार ४०० दिंड्यांना होणार आहे. त्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात. दुखापतग्रस्त होतात. एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत काहींचा मृत्यूही होतो; तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही.
विशेष सहाय्य विभागाकडून अनुदान जाहीर
अनुदान मिळाल्यास त्यांची वारी घडण्यास मदत होईल, अशी मागणी वारकरी संप्रदायातून होत होती. या विनंतीला मान देऊन सरकारने २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. मागील वर्षी काहीसा विलंब झाला. मात्र, अनुदान वितरित करण्यात आले होते. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुदान जाहीर केले आहे.

