Headlines

Pune Consumer Commission slams Reliance Outlet for selling Expired Cheese to Customer; आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा; Expiry उलटलेल्या चीजची विक्री, पुणेकर ग्राहकाने ‘ब्रँड’चा बॅण्ड वाजवला


Pune Consumer Commission : ‘रिटेल’ कंपनीने ग्राहकाला दिलेल्या मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये द्यावे, असेही ग्राहक आयोगाने निकालात नमूद केले आहे.

Pune Cheese Consumer Court Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कालबाह्य झालेले (एक्स्पायरी डेट उलटलेले) चीज विकणे आणि पनीर व शाम्पू विकताना छापील किमतीपेक्षा जास्त पैसे उकळून ग्राहकाची फसवणूक करणे नामांकित ‘रिटेल’ ब्रँडला महागात पडले आहे. पुण्याच्या ग्राहक आयोगाने या कंपनीला ग्राहक सेवेत त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धतीबद्दल दोषी धरले असून, १३८ रुपये वार्षिक आठ टक्के व्याजासहित ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले.

तीस हजारही देण्याचे आदेश

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. ‘रिटेल’ कंपनीने ग्राहकाला दिलेल्या मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये द्यावे, असेही आयोगाने निकालात नमूद केले आहे.

‘आमचा ब्रँड अत्यंत मोठा, करायचे ते करा’

या प्रकरणी खराडी येथील बाळासाहेब खोडदे यांनी ‘रिलायन्स रिटेल लिमिटेड’ कंपनीविरोधात ग्राहक आयोगात दाद मागितली होती. तक्रारदारांच्या वतीने ॲड. अनिलकुमार जाधव यांनी काम पाहिले. तक्रारदारांच्या मुलांनी १६ जानेवारी २०२२ रोजी खराडी बायपास येथील ‘रिलायन्स स्मार्ट आउटलेट’मधून चारशे ग्रॅम वजनाचे चीज खरेदी केले. घरी आल्यानंतर हे चीज वापराची मुदत १० डिसेंबर २०२१ रोजीच संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत, तक्रारदारांनी आउटलेटच्या व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता, ‘आमचा ब्रँड अत्यंत मोठा असून, आमच्याविरोधात कोणी काही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा,’ असे त्याने उद्दामपणे सुनावले.
Maharashtra TimesDr Mehul Rathod : 11 वाजता घरुन निघाले पण फोन उचलेनात; पत्नी-सहकाऱ्यांची शोधाशोध, लातूरच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञाची बॉडी साडेचारला गाडीत सापडली
या घटनेनंतर तक्रारदारांच्या मुलाने याच आउटलेटमधून १० एप्रिल २०२२ रोजी पनीर व १४ जून २०२२ रोजी शाम्पू खरेदी केला. मात्र, पनीरची मूळ छापील किंमत २२५ रुपये असताना कंपनीने २३५ रुपये म्हणजेच १० रुपये जादा वसूल केले; तर शाम्पूची मूळ किंमत ३०५ रुपये असताना कंपनीकडून ३०९ रुपये म्हणजेच चार रुपये जादा उकळण्यात आले. या फसवणुकीविरोधात तक्रारदाराने ग्राहक आयोगाकडे दाद मागितली.

Tukaram Mundhe : २.३ कोटी लिटर भेसळयुक्त दूध, डिटर्जंट पावडर, पाम तेलाचा वापर, FDA ने केला पर्दाफाश

ग्राहकांच्या जिवाला धोका

कालमर्यादा संपलेल्या खाद्य उत्पादनांची विक्री केल्याने केवळ तक्रारदारच नव्हे, तर असंख्य निष्पाप ग्राहकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय उत्पादनांची विक्री करताना छापील किमतीपेक्षा अतिरिक्त रक्कम उकळणे ही अनुचित व्यापार पद्धत आहे, असे कडक ताशेरेही आयोगाने कंपनीवर ओढले आहेत.
Maharashtra TimesDharwad Doctor Murder : डॉक्टर नवऱ्याचा जीव घेतला, 8 वर्षांच्या लेकावरही वार; बॉडीशेजारी डॉक्टर बायको फोन स्क्रोल करत बसलेली!

कंपनीचा बचाव आयोगाने फेटाळला

‘चीज, पनीर, शाम्पू तक्रारदारांच्या मुलांनी विकत घेतले असून, तक्रारदार स्वतः ग्राहक नसल्याने त्यांची तक्रार पात्र ठरत नाही; तसेच चीज बाजारातही उपलब्ध असून, तक्रारदारांनी त्याचे देयक दाखविलेले नाही,’ असा बचाव कंपनीने केला; आयोगाने हा बचाव पूर्णपणे फेटाळला. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रारदार लाभार्थी ठरत असल्याने त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंचे कव्हर, आउटलेटच्या देयकांच्या प्रतींवरील बारकोड क्रमांक एकच आहे. त्यामुळे कालबाह्य चीज याच आऊटलेटमधून विकले गेले असल्याचे स्पष्ट होते, असे आयोगाने निकालात नमूद केले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा