priya ghanghas wins gold in boxing india medal tally 32 commonwealth games 2026 ; जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड
priya ghanghas wins gold in boxing india medal tally 32 commonwealth games 2026 ; जय हो! कॅनडाच्या बॉक्सरची धुळधाण उडवत प्रियाने जिंकलं सुवर्णपदक; भारताच्या खात्यात बॉक्सिंगमधील चौथं गोल्ड
Priya Ghanghas CWG 2026 Boxing Gold : ६० किलो वजनी गटात प्रिया घनघासचा सुवर्ण धमाका पाहायला मिळाला आहे. कॅनडाच्या अल अमिदाचा ४-१ ने पराभव करत भारताची एकूण पदकसंख्या ३२ वर पोहोचवली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्तम कामगिरी सुरूच आहे. बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रिया घनघासने ६० किलो वजनी गटात कॅनडाच्या अल अमिदाचा ४-१ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बॉक्सिंगमधील भारताचे हे आजचे चौथे सुवर्णपदक आहे. सामन्याच्या सुरुवातीला कॅनडाची खेळाडू आघाडीवर होती. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत प्रियाने जबरदस्त पुनरागमन केले. पंचांनी ४-१ असा स्प्लिट डिसीजन देत प्रियाला विजेते घोषित केले. याआधी अवघ्या १५ मिनिटांपूर्वी साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटात इंग्लंडच्या रुबी व्हाईटला ५-० ने हरवून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
भारताकडे आता १० सुवर्णपदके
प्रिया घनघासच्या या विजयासह भारताच्या खात्यात आता एकूण १० सुवर्णपदके जमा झाली आहेत. याशिवाय ६३ किलो वजनी गटात उन्नती शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला हरवून कांस्यपदक जिंकले आहे. सध्या १० सुवर्ण, १५ रौप्य आणि ७ कांस्य अशा एकूण ३२ पदकांसह भारत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत कालचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला होता. ज्युडोमध्ये भारताने तीन पदके (दोन सुवर्ण आणि एक रौप्य) जिंकली होती. तर भालाफेक स्पर्धेत ८ वर्षांनंतर राष्ट्रकुलमध्ये परतलेल्या नीरज चोप्राने रौप्यपदक आणि यशवीर सिंगने कांस्यपदक पटकावले होते.
आज रात्री आणखी पदकांची आशा
आज राष्ट्रकुल स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असून भारतीय खेळाडू अजूनही अनेक स्पर्धांमध्ये मैदानात उतरणार आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा