पावसाळ्यातील खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेची तयारी; २१० पंप कार्यान्वित, लोकल प्रवासाला दिलासा| Maharashtra Times
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी भरण्याच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेची भिस्त पंपावरच असणार आहे. पावसाच्या पाण्याचा वेगाने उपसा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २१० पंप कार्यान्वित केले आहेत. कसारा आणि लोणावळा घाटमार्गावर कोसळणाऱ्या दरडींपासून बचावासाठी जाळी आणि गॅबियन वॉल अशा उपाययोजनांना बळकटी देण्यात आली आहे. मान्सून लक्षात घेता मध्य रेल्वेने उपाययोजना जाहीर केल्या आहेत….
