Headlines

NRI Inheritance FEMA Rules; तुमची जमीन परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या नावावर होऊ शकते का? फेमा अन् राज्याचे कायदे समजून घ्या


Property Transfer Rules: आपल्या कष्टाच्या कमाईतून कमावलेली मालमत्ता, विशेषतः वडिलोपार्जित शेतजमीन आपल्यानंतर आपल्या मुलांच्या कामाला यावी असं प्रत्येक पालकांना वाटतं. आजच्या काळात शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक मुलं परदेशात जातात, तिथेच स्थायिक होतात आणि तिथलेच नागरिकत्व स्वीकारतात. पण परदेशात राहणारी मुलं भारतातील शेतजमीन वारसाहक्काने मिळवण्याचा विचार करतात, तेव्हा अनेक पेच समोर उभे ठाकतात.

गेल्या काही वर्षांत अनेक लोक भारत सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत, पण भारताशी त्यांचे नाते अबाधित राहिले आहे. घर असो, दुकान किंवा शेतजमीन, अनेक अनिवासी भारतीयांची भारतात मालमत्ता आहे. भारतीय कुटुंबांमध्ये वारसा हक्काचे वाद निर्माण होणे ही एक सामान्य बाब असून यादरम्यान, तुम्हीही तुमच्या मुलांना शेतजमीन हस्तांतरित करण्याचा विचार करत असाल तर FEMA आणि राज्यांचे स्थानिक कायदे माहिती असले पाहिजे.

Maharashtra Times8th Pay Commission: रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी, OPS अन् पेन्शनमधील सुधारणेपर्यंत; आठव्या वेतन आयोगात काय ठरणार? कर्मचाऱ्यांची धडधड

NRI मुलांना मालमत्ता हस्तांतरणाचे नियम

फेमा नियमांनुसार, अनिवासी भारतीय म्हणजे NRIs किंवा OCI कार्डधारक भारतात थेट शेतजमीन खरेदी करू शकत नाहीत. तसलेच भेट म्हणूनही दिली जाऊ शकत नाही, पण मृत्युपत्राद्वारे वारसा हक्काने मिळालेली जमीन याला अपवाद आहे. याशिवाय मृत्युपत्रांसोबतच स्थानिक राज्य कायदे देखील या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये शेतजमीन मृत्युपत्राद्वारेसुद्धा केवळ शेतकऱ्यालाच हस्तांतरित केली जाऊ शकते.

मात्र, मुलगा शेतकरी नसल्यास मृत्युपत्र केलेले असले तरीही मालमत्तेचे हस्तांतरण करणे अवघड होते. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल, अन्यथा कायदेशीर अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच लक्षात घ्या की वडिलोपार्जित शेतजमिनीच्या भविष्यातील विक्रीसाठीही कडक नियम असून अशी जमीन केवळ भारतात राहणाऱ्या भारतीय रहिवाशांनाच विकली जाऊ शकते, इतरांना नाही.

Maharashtra TimesNew Tax Bill: किती वसूल करणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर शुल्क, युजर्सचा संताप; आता सरकारने दिले स्पष्टीकरणवारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेचा नियम

एखाद्या अनिवासी भारतीयाला वारसा हक्काने भारतातील मिळालेली मालमत्ता विकून मिळालेली रक्कम परदेशात पाठवायची असेल, तर सर्वप्रथम मृत्युपत्र किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच Tax Clearance Certificate देखील आवश्यक असून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता दुसऱ्या अनिवासी भारतीयाकडून मिळाली असेल, तर आरबीआयची (RBI) मंजुरी आवश्यक असू शकते. म्हणजे कागदपत्रे पूर्ण असतील तर प्रक्रिया सोपी आहे, अन्यथा अडथळे येऊ शकतात.

दुसरीकडे, परदेशात जमीन विकून मिळणाऱ्या रकमेच्या हस्तांतरणावर मर्यादा घालण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात NRO खात्याद्वारे जास्तीत जास्त 10 लाख डॉलर्स पाठवता येतात, तर या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयची मंजुरी आवश्यक असेल.

Maharashtra TimesRBI New Rules: EMI न भरल्यास बँक मोबाईल-लॅपटॉप लॉक नाही करू शकणार; कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा, लोन रिकव्हरीच्या दादागिरीला लगामअशा परिस्थितीत, कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही हयातीत असताना जमीन विकावी आणि त्यातून मिळालेली रक्कम तुमच्या मुलांना द्यावी, असा तज्ञ सल्ला देतात. या शिवाय परदेशस्थ नागरिकांसाठी (OCIs) बिगरशेती जमीन मिळवणे खूप सोपे असते त्यामुळे, त्या जमिनीचे बिगरशेती मालमत्तेत रूपांतर करता येते.

पैसे पाठवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत

  • मालमत्ता विकल्यानंतर पैसे NRO खात्यात जमा करा
  • फॉर्म 15सीए, 15सीबी आणि Repatriation Application अर्ज भरा.
  • तसेच टॅक्स क्लिअरन्स, विक्रीपत्र आणि बँक स्टेटमेंट यांसारखी कागदपत्रे सादर करा.
  • बँक पैशांची पडताळणी करून परदेशात पाठवेल.
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत