Nirav Modi: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्ये राहिलेल्या भारतीय नागरिकांना परत स्वीकारण्याच्या मुद्द्यावर भारत कठोर भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एप्रिल २०२१मध्ये ब्रिटनच्या गृहमंत्री असताना प्रीती पटेल यांनी नीरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. न्यायालयात प्राथमिकदृष्ट्या खटला सिद्ध झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला होता. सध्या त्या हुजूर पक्षाच्या ‘शॅडो परराष्ट्रमंत्री’ आहेत. ‘द डेली टेलिग्राफ’च्या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या पॉडकास्टमध्ये पटेल यांनी म्हटले, की ‘ब्रिटनकडून नीरव मोदीचे प्रत्यार्पण न झाल्याने भारतीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.’
US India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात
५५ वर्षीय नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे दोन अब्ज डॉलरच्या घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तो भारताला हवा आहे. ब्रिटनमधील त्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले असून, फ्रान्समधील युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राइट्समध्ये केलेली अखेरची विनंतीही फेटाळली गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘सन २०१९ ते २०२२ या काळात टोरी सरकारमध्ये गृहमंत्री असताना या प्रकरणामुळे भारताशी व्यवहार कठीण झाले होते,’ असे पटेल यांनी सांगितले.
Crorepati Stock: शेअर कसला हा तर अस्सल सोनं! 12 पैशांचा स्टॉक पोहोचला 48 रुपयांवर, लाखभर रूपये गुंतवणारे झाले करोडपती
‘नीरव मोदी भारतातील तुरुंगात असायला हवा होता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथे शिक्षा भोगत असायला हवा होता. ब्रिटनचे प्रत्यार्पण कायदे यासाठीच आहेत,’ असे पटेल यांनी सांगितले.
आपली व्यवस्था योग्य आणि न्याय्य पद्धतीने काम करीत असती, प्रक्रिया आणि कारणांच्या गर्तेत अडकली नसती, तर तो या देशात नसता. तो अजूनही येथे आहे, याचा मला खरोखरच धक्का बसला आहे. त्यामुळे भारत सरकारला आमच्याबरोबर काम करण्याबाबत खूपच निराशा वाटत असावी, असे मला वाटते. –– प्रीती पटेल, माजी गृहमंत्री, ब्रिटन

